Lokrakshanay
Friday, August 7, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१५ ऑगस्टच्या भाषणात तरुणांच्या प्रश्नांवर बोला; अभिजीत दीपके यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 7, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, महाराष्ट्र
१५ ऑगस्टच्या भाषणात तरुणांच्या प्रश्नांवर बोला; अभिजीत दीपके यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त (नॅशनल हँडलूम डे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर विशेष व्हिडिओ शेअर करत नागरिकांना हँडलूमचे कपडे परिधान करून त्याचे व्हिडिओ तयार करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनावर कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, आगामी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणात देशातील तरुणांच्या प्रश्नांवर थेट भाष्य करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. केवळ सोशल मीडिया किंवा विविध उपक्रमांद्वारे आवाहन करण्यापुरते मर्यादित न राहता, देशातील तरुणांचे भवितव्य, रोजगाराच्या संधी आणि शिक्षणाशी संबंधित अडचणी यावर सरकारने कोणती ठोस पावले उचलली आहेत, याबाबत पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी दीपके यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या हँडलूम दिनाच्या व्हिडिओवर अभिजीत दीपके यांनी “प्राईम इन्फ्लुएन्सर” अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यानंतर स्वतंत्र व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यांनी तरुणांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. देशातील युवा वर्ग सध्या शिक्षण, रोजगार आणि भविष्यातील संधींसह अनेक आव्हानांचा सामना करत असल्याचे सांगत, १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी तरुणांना आश्वस्त करणारे आणि त्यांच्या प्रश्नांना संबोधित करणारे भाषण करावे, असे दीपके यांनी म्हटले आहे. विशेषतः सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वाढती शैक्षणिक फी हा गंभीर विषय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसच्या वाढत्या शुल्कामुळे अनेक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीकडून तरुणांच्या शैक्षणिक आणि रोजगाराशी संबंधित अडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी ‘क्या बोलती पब्लिक’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अभिजीत दीपके यांनी दिली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून देशातील युवा वर्गाच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि शिक्षण व रोजगाराशी संबंधित अडचणी समोर आणण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न केवळ चर्चेपुरते न राहता त्यावर ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले आहे. आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाकडे देशातील तरुणांचेही लक्ष असणार असून, त्यांच्या शिक्षणाचा खर्च, रोजगाराच्या संधी आणि भविष्यातील सुरक्षितता यांसारख्या विषयांवर सरकारची भूमिका स्पष्ट व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हँडलूमसारख्या भारतीय परंपरा आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्याबरोबरच देशातील तरुणांच्या प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित प्रश्नांवरही पंतप्रधानांनी भाष्य करावे, असा सूर दीपके यांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त झाला आहे. ‘क्या बोलती पब्लिक’ मोहिमेच्या माध्यमातून तरुणांच्या आवाजाला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला जाणार असून, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर सार्वजनिक पातळीवर चर्चा घडवून आणण्याचा सीजेपीचा मानस असल्याचे दीपके यांनी सांगितले.

Previous Post

डोंबिवलीत रिक्षा मिळत नसल्याने नागरिक रस्त्यावर; केळकर रोडवर प्रवाशांचे ठिय्या आंदोलन सुरू

Next Post

‘काम बंद केले तर पगारही नाही’; हायकोर्टाच्या दणक्यानंतर डॉक्टरांचा संप मागे

Next Post
‘काम बंद केले तर पगारही नाही’; हायकोर्टाच्या दणक्यानंतर डॉक्टरांचा संप मागे

‘काम बंद केले तर पगारही नाही’; हायकोर्टाच्या दणक्यानंतर डॉक्टरांचा संप मागे

BreakingNews

नवी मुंबईत देशभक्तीसोबतच आरोग्याचा जागर; ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला जोडली आरोग्याची पाऊले

जिजाऊ संस्थेचा शैक्षणिक उपक्रम; पिवळी केंद्रातील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वाटप

महिला आशिया चषकात भारत-पाकिस्तान आमनेसामने; ५ सप्टेंबरला महामुकाबला!

गणेशोत्सवाच्या उत्साहात आवाजावर मर्यादा; ढोल-ताशा सरावावर आता महापालिकेची नजर!

ठाणे जिल्हा परिषदेकडून नागरिकांसाठी WhatsApp Chatbot सेवा सुरू; शासकीय सेवा आता घरबसल्या!

‘काम बंद केले तर पगारही नाही’; हायकोर्टाच्या दणक्यानंतर डॉक्टरांचा संप मागे

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.