Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा; अंबरनाथ तालुक्यात भीषण पाणी टंचाई

ग्रामीण भागातील अनेक गाव, पाड्यांत पाच दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी महिला, लहान मुलींची पाण्याच्या टाक्यांजवळ झुंबड उडत आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 19, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा; अंबरनाथ तालुक्यात भीषण पाणी टंचाई
Share on FacebookShare on Whatsapp

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील लहान गावे तसेच पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्य शासनाकडून जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू असली तरी ही कामे पूर्ण होण्यास अद्याप अवधी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गाव, पाड्यांत पाच दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी महिला, लहान मुलींची पाण्याच्या टाक्यांजवळ झुंबड उडत आहे. नैसर्गिक जलस्रोत आणि मुबलक पाण्याचा साठा असलेल्या धरणांचा वेढा असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पाणीटंचाईची स्थिती आहे. अंबरनाथ तालुक्यात २८ ग्रामपंचायती आहेत. यातील अनेक गावे धरण क्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर आहेत.

बदलापूरपासून जवळच असलेल्या चरगाव या ग्रुप ग्रामपंचायतीत आठ पाडे आहेत. प्रत्येक गावात आठशे ते हजार लोकवस्ती आहे. येथील नागरिकांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने मोठे हाल होत आहेत. गावात असलेल्या बोअरवेलमधील पाणी एका टाकीत साचवून ठेवले जाते. हे पाणी नागरिकांना पाच दिवसांतून एकदाच उपलब्ध होत असल्याने पाणी भरण्यासाठी टाकीजवळ गावातील महिला आणि लहान मुलींची एकच झुंबड उडते. सध्या या गावामध्ये जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनंतर्गत विहीर, पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू असून अनेक नवीन बोअरवेलची कामे सुरू असल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. योजनांतर्गत ५० टक्के कामे पूर्ण झाली असून फेब्रुवारीपर्यंत ही कामे पूर्ण होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी दिली. शासकीय योजनांचा संथ कारभार पाहता नागरिकांना जानेवारी महिन्यातच पाच दिवसांतून एकदा पाणी मिळत असेल तर, येत्या उन्हाळ्यात येथील नागरिकांना पाण्यासाठी काही किलोमीटर वणवण करावी लागण्याच्या भीतीने ग्रामस्थ चिंतेत आहेत.

Previous Post

कुशल मनुष्यबळासाठी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या – मंत्री मंगल प्रभात लोढा

Next Post

महिलेचे अडीच लाखांचे दागिने श्रीराम दर्शनाचं आमिष दाखवत केले लंपास

Next Post
४३ हजार रुपयांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याची फसवणूक, बीकेसी पोलिसांकडून तपास सुरू

महिलेचे अडीच लाखांचे दागिने श्रीराम दर्शनाचं आमिष दाखवत केले लंपास

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.