Lokrakshanay
Thursday, June 4, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

ठाणे जिल्हा प्रशासनाची संवेदनशील धाव! टंचाईग्रस्त १२७ पाड्यांना ४० टँकर्सद्वारे पाण्याचा दिलासा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 4, 2026
in Uncategorized, ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
ठाणे जिल्हा प्रशासनाची संवेदनशील धाव! टंचाईग्रस्त १२७ पाड्यांना ४० टँकर्सद्वारे पाण्याचा दिलासा
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा मिळावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून टंचाईग्रस्त ३९ गावे आणि १२७ पाडे अशा एकूण १६६ लोकवस्त्यांसाठी ४० पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे ५८ हजार ४४३ नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या तालुक्यांमध्ये सध्या गंभीर पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झालेली नसून तेथे टँकरची आवश्यकता भासलेली नाही. मात्र, भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मुरबाड तालुक्यातील ६ गावे आणि १० पाड्यांमधील ५ हजार ६६६ नागरिकांसाठी ३ शासकीय आणि ३ खाजगी अशा एकूण ६ टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. तर सर्वाधिक फटका बसलेल्या शहापूर तालुक्यातील ३३ गावे आणि १२७ पाड्यांमधील ५२ हजार ७७७ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन ३७ खाजगी टँकर तातडीने कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण ४० टँकरपैकी तब्बल ३७ टँकर शहापूरमध्ये तैनात करून प्रशासनाने दुर्गम भागातील नागरिकांप्रती संवेदनशीलता दाखवली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून टँकरच्या फेऱ्या, वितरण आणि पाणीपुरवठ्याचे संनियंत्रण डिजिटल प्रणालीद्वारे केले जात आहे. १८ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या या व्यवस्थेमुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळत असून पाणीटंचाईच्या संकटावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

Previous Post

६२ लाख ‘लाडक्या बहिणींची’ ई-केवायसी बाकी; अर्जांची पुन्हा पडताळणी होणार – मंत्री अदिती तटकरांचे आश्वासन

Next Post

नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना विलंब; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तक देण्यासाठी बालभारतीची धावपळ

Next Post
नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना विलंब; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तक देण्यासाठी बालभारतीची धावपळ

नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना विलंब; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तक देण्यासाठी बालभारतीची धावपळ

BreakingNews

ई-बस चालकांसाठी चार आठवड्यांचे प्रशिक्षण बंधनकारक! – बेस्टचा मोठा निर्णय

नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांना विलंब; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तक देण्यासाठी बालभारतीची धावपळ

ठाणे जिल्हा प्रशासनाची संवेदनशील धाव! टंचाईग्रस्त १२७ पाड्यांना ४० टँकर्सद्वारे पाण्याचा दिलासा

६२ लाख ‘लाडक्या बहिणींची’ ई-केवायसी बाकी; अर्जांची पुन्हा पडताळणी होणार – मंत्री अदिती तटकरांचे आश्वासन

ठाण्यात FDA ची मोठी कारवाई; ११ लाखांचे आंबे जप्त, ३७ जणांना अटक

गोव्यातील मंगेशीत उभारले जाणार लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे भव्य स्मारक

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.