Lokrakshanay
Thursday, August 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

हॉकी विश्वचषकातही भारताचाच बोलबाला! पाकिस्तानचा ५-३ ने पराभव करत टॉप-८ मध्ये दमदार प्रवेश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 20, 2026
in क्रीडा, ताज्या बातम्या, देश -विदेश, महाराष्ट्र
हॉकी विश्वचषकातही भारताचाच बोलबाला! पाकिस्तानचा ५-३ ने पराभव करत टॉप-८ मध्ये दमदार प्रवेश
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : हॉकी विश्वचषकात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५-३ असा शानदार विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व (टॉप-८) फेरीत दिमाखात प्रवेश केला. अत्यंत अटीतटीच्या आणि रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. भारताच्या विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांनी प्रत्येकी दोन गोल करत मोलाची भूमिका बजावली, तर हार्दिक सिंग याने पेनल्टी स्ट्रोकवर एक गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानकडून हनान शाहिद याने दोन आणि सुफियान खान याने एक गोल केला. या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर भारताने पुढील फेरीत आत्मविश्वासाने पाऊल टाकले. ॲमस्टेलवीन येथील वागेनर हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्याची सुरुवात भारतासाठी अत्यंत सकारात्मक ठरली. पाचव्या मिनिटाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगचा पहिला प्रयत्न बचावपटूला लागला. मात्र, दुसऱ्या संधीचा अचूक फायदा घेत त्याने चेंडू गोलजाळ्यात धाडत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतील हरमनप्रीतचा हा चौथा गोल ठरला. त्यानंतर नवव्या मिनिटाला पाकिस्तानच्या हमादुद्दीन मुहम्मदला ग्रीन कार्ड मिळाल्याने पाकिस्तान काही काळ दहा खेळाडूंनी खेळला. या संधीचा फायदा घेत अभिषेकने शानदार फिल्ड गोल करत भारताची आघाडी २-० अशी वाढवली.

भारताने आक्रमणाचा वेग कायम ठेवत पाकिस्तानच्या बचावावर सातत्याने दबाव निर्माण केला. त्यातून आणखी एक गोल करत भारताने ३-० अशी आघाडी घेतली. मात्र, पाकिस्तानने हार न मानता पुनरागमनाचा प्रयत्न केला. २२व्या मिनिटाला हनान शाहिदने रिबाउंडवर गोल करत पाकिस्तानचे खाते उघडले. भारताने लगेचच प्रत्युत्तर देत २४व्या मिनिटाला अभिषेकच्या दुसऱ्या गोलच्या जोरावर आघाडी ४-१ अशी केली. त्यानंतर पाकिस्तानला पेनल्टी मिळाल्यावर सुफियान खानने अचूक फटका मारत गोल केला आणि पाकिस्तानची पिछाडी २-४ अशी कमी केली. पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताने दोन गोलांची आघाडी कायम राखत सामन्यावर मजबूत पकड ठेवली. दुसऱ्या सत्रात काही काळ भारताला दहा खेळाडूंनी खेळावे लागले, तरीही भारतीय बचावफळीने उत्कृष्ट कामगिरी करत पाकिस्तानला संधी दिली नाही. ३४व्या मिनिटाला अर्शदविरुद्ध स्टिक फाऊल झाल्यानंतर भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. ३५व्या मिनिटाला हार्दिक सिंगने हा स्ट्रोक अचूकपणे गोलमध्ये रूपांतरित करत भारताची आघाडी ५-२ अशी केली. हा गोल भारतासाठी निर्णायक ठरला. त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा आक्रमणाची धार वाढवली. ४१व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर भारतीय बचावफळीने यशस्वीपणे रोखला. मात्र, ४६व्या मिनिटाला हनान शाहिदने पुन्हा गोल करत पाकिस्तानची पिछाडी ३-५ अशी कमी केली आणि सामन्यात पुन्हा रंगत निर्माण झाली. अंतिम दहा मिनिटांत पाकिस्तानने गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. ५७व्या मिनिटाला पाकिस्तानने भारतीय खेळाडूच्या पायाला चेंडू लागल्याचा दावा करत पेनल्टी कॉर्नरची मागणी केली. टीव्ही अंपायरने पुनरावलोकन केल्यानंतर पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर देण्यात आला. मात्र, भारतीय बचावफळीने पुन्हा एकदा भक्कम बचाव करत पाकिस्तानचा हा प्रयत्नही निष्फळ ठरवला. अखेरीस भारताने ५-३ असा विजय मिळवत विश्वचषकातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. भारताच्या विजयात हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांच्या आक्रमक खेळाइतकीच बचावफळीची कामगिरीही महत्त्वाची ठरली. निर्णायक क्षणी गोलरक्षक आणि बचावपटूंनी पाकिस्तानचे अनेक हल्ले निष्फळ ठरवले. या विजयामुळे भारताने टॉप-८ फेरीत प्रवेश निश्चित केला असून, स्पर्धेतील विजेतेपदाच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानला या पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी नेहमीप्रमाणे हस्तांदोलन केले नाही. मात्र, त्यांनी एकमेकांना ‘हाय-फाइव्ह’ देत खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत पाच सामने झाले असून, त्यापैकी भारताने तीन तर पाकिस्तानने दोन सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, दोन्ही संघांमधील यापूर्वीचा विश्वचषक सामना २०१० मध्ये नवी दिल्ली येथे झाला होता. त्या वेळीही भारताने पाकिस्तानचा ४-१ असा पराभव केला होता. यंदाच्या विजयामुळे भारताने विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धची आपली सरशी आणखी मजबूत केली असून, आगामी फेरींसाठी संघाचा आत्मविश्वास निश्चितच उंचावला आहे.

Previous Post

मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच धावणार १५० नवीन आलिशान डबलडेकर एसी बसेस

Next Post

वडा-पावऐवजी इडली-डोसा अन् कोलाऐवजी ताक; FDAच्या निर्देशानंतर शालेय कँटीनमध्ये आरोग्याला प्राधान्य

Next Post
वडा-पावऐवजी इडली-डोसा अन् कोलाऐवजी ताक; FDAच्या निर्देशानंतर शालेय कँटीनमध्ये आरोग्याला प्राधान्य

वडा-पावऐवजी इडली-डोसा अन् कोलाऐवजी ताक; FDAच्या निर्देशानंतर शालेय कँटीनमध्ये आरोग्याला प्राधान्य

BreakingNews

वडा-पावऐवजी इडली-डोसा अन् कोलाऐवजी ताक; FDAच्या निर्देशानंतर शालेय कँटीनमध्ये आरोग्याला प्राधान्य

हॉकी विश्वचषकातही भारताचाच बोलबाला! पाकिस्तानचा ५-३ ने पराभव करत टॉप-८ मध्ये दमदार प्रवेश

मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच धावणार १५० नवीन आलिशान डबलडेकर एसी बसेस

मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई; आधी नोटीस, नंतर परवाना कायमचा रद्द!

रक्षाबंधननिमित्त लाडक्या बहिणींना मोठी ओवाळणी; महाराष्ट्रात ३,००० तर मध्य प्रदेशात १,७५० रुपये

युट्यूब क्रिएटर्सची चांदी! २४ ऑगस्टपासून व्हिडिओ सुरू होताच वाढणार ‘व्ह्यूज’चा आकडा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.