वृत्तसंस्था : अनेक देशांमध्ये अल्पवयीन मुलांवर सोशल मीडिया बंदी घालण्यात आली असून आता भारतातही अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडिया वापरावर बंदी येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याचे संकेत दिले आहेत. आयटी मंत्र्यांनी सांगितले की, वय-आधारित निबंधांबाबत सोशल मीडिया कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.
आम्ही पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरवू, खरं तर, जगभरातील अनेक देशांनी अलीकडेच १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे किंवा विविध निर्बंध लादले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. सरकार सोशल मीडिया कंपन्यांशी चर्चा करत आहे, परंतु कोणताही अंतिम निर्णय किंवा वेळापत्रक जाहीर केलेले नाही. जर ते लागू केले गेले तर त्याचा भारतातील लाखो तरुण वापरकत्यांवर लक्षणीय परिणाम होईल. विशेषतः भारत हा जगातील सर्वांत मोठा सोशल मीडिया बाजार असल्याने त्याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.

