मुंबई : आपल्या घरात उंदीर आला तर आपण काय करतो? गणपतीचे वाहन आहे म्हणून आपण उंदरी घरात ठेवतो का? असे कोण जैन लोक आहेत जी कबुतरांवर बसून फिरायला जातात? माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? असा थेट प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहर व्यवस्थापन विषयावर भेट घेतल्यानंतर नेमकी काय चर्चा झाली यासंदर्भात शिवतीर्थ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. कबुतरं, हत्ती या विषयांच्या नावाखाली मुलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं.
“आपल्या घरात जर चार उंदीर आले तर आपण काय करतो? गणपतीचे वाहन आहे म्हणून आपण उंदीर घरात ठेवतो का? असे कोण जैन लोक आहेत जी कबुतरांवर बसून फिरायला जातात? माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? म्हणजे माणंस मेलेली चालतात. हा राजकीय विषय असून, तो तसाच लावायचा होता. मग यांच्याकडून प्रतिक्रिया मिळत नाही हे त्यांना दिसलं,” असं ते म्हणाले.

