Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

११ वाहन मालकांकडून १७ हजाराचा दंड वसूल; उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर

११ वाहनांची टोइंग करण्यात आली असून मालकांकडून १७ हजार रुपयांचा दंड वसूलण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 1, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
११ वाहन मालकांकडून १७ हजाराचा दंड वसूल; उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर
Share on FacebookShare on Whatsapp

उल्हासनगर :  मागच्या आठवड्यात महानगरपालिका आयुक्त अजीज शेख आणि ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.विनय राठोड यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर आली आहेत. या कारवाईत ११ वाहनांची टोइंग करण्यात आली असून मालकांकडून १७ हजार रुपयांचा दंड वसूलण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. आयुक्त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली २४ एप्रिल रोजी महानगरपालिका क्षेत्रातील वाहतुक समस्येबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.विनय राठोड, सहायक पोलीस आयुक्त विजय पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे, सुधाकर खोत, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,मुख्यालय उपायुक्त किशोर गवस आदी उपस्थित होते.बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यांवर बेवारस पडून आहेत.

या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी होत असून रस्त्यांची साफसफाई करताना अडथळा होत असल्याने अशा बेवारस वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पालिकेचे नोडल अधिकारी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक व स्थानिक पोलीस यांच्या उपस्थितीत कॅम्प नं. १ ते ३ मधील मुख्य रस्त्यांवरील ११ बेवारस वाहने टोइंग करण्यात आली तसेच वाहन मालकांकडून १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रस्त्यावर बेवारस वाहने आढळून आल्यास संबंधीतांना ४८ तासाची नोटीस बजावण्यात येणार आहे. नोटीस मिळाल्यावरही वाहन न उचलल्यास महानगरपालिका ते वाहन जप्त करणार आहे. त्यानंतर आरटीओ मार्फत वाहनाचे मूल्यांकन करून त्याचा लिलाव करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.

Previous Post

मालमत्ता करा इतका दंड आकारण्याचा इशारा देताच दुकानांवर झळकले मराठीत नामफलक

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये आढळली चाळीस लाखांची रोकड

Next Post
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये आढळली चाळीस लाखांची रोकड

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमध्ये आढळली चाळीस लाखांची रोकड

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.