Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राज्यातील रिक्षा, टॅक्सींना मिळणार पार्किंगची सुविधा – सरकारचा ग्रीन सिग्नल!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 11, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
राज्यातील रिक्षा, टॅक्सींना मिळणार पार्किंगची सुविधा – सरकारचा ग्रीन सिग्नल!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : चारचाकी वाहनांना पार्किंगची सुविधा असते. मात्र हजारो लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या रिक्षा, टॅक्सींना पार्कंगसाठी अधिकृत व्यवस्था नसते. त्यामुळे त्यांना सातत्याने दंड भरावा लागतो. दुचाकींसाठीही तशी काहीच व्यवस्था नाही. त्यामुळे रिक्षा, टॅक्सींना पार्कंगची सुविधा पुरवा आणि पार्कंगसाठी दुचाकीस्वारांनाही दिलासा द्या, अशी मागणी शिवसेना आमदारांनी आज विधान परिषदेत केली. सरकारने त्याला ग्रीन सिग्नल दिला असून त्यासंदर्भात अभ्यासगट स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे.

राज्यात वाहतूक पोलिसांकडून ई-चालान तयार करण्यासाठी खासगी मोबाईल फोनचा वापर करण्यात येत असल्याबद्दल शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मुंबईतील पार्किंगच्या समस्येकडे लक्ष वेधले. मुंबईसारख्या शहरात आजही अनेक चाळी, इमारती आणि झोपडपट्टी भागात नव्या टॉवर्सप्रमाणे पार्कंगची स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना त्यांची वाहने रस्त्याकडेला पार्क करावी लागतात. त्या वाहनांवर कारवाई करू नये अशा सूचना वाहतूक पोलिसांना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. रिक्षा आणि टॅक्सीवाले पार्किंग नसल्याने आपल्या घराजवळच गाड्या उभ्या करतात. ते त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे, मात्र टॅक्सी, रिक्षावाल्यांना त्यासाठी महिन्याला पाच-सहा वेळा दंड आकारला जातो. मिळालेले उत्पन्न दंड भरण्यात गेले तर ते जगणार कसे, असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. वरिष्ठ अधिकाऱयांशिवाय इतर कुणीही चालान कापू नये असा नियम सरकारने बनवावा, अशी सूचना त्यांनी मांडली. वाहतूक पोलिसांनी दंड आकारूनही दंड भरला जात नाही अशा वाहनचालकांना पेट्रोल मिळणार नाही अशी व्यवस्था निर्माण करावी, अशी सूचना मनीषा कायंदे यांनी केली. काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि भाई जगताप तसेच भाजपच्या प्रसाद लाड यांनीही चर्चेत भाग घेऊन सूचना मांडल्या.

Previous Post

राज्यात भीक मागणे गुन्हा? लवकरच होणार कायदा

Next Post

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी नोंदणी करणे अनिवार्य – केंद्र शासनाचे शिक्षण विभागाला आदेश

Next Post
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी नोंदणी करणे अनिवार्य – केंद्र शासनाचे शिक्षण विभागाला आदेश

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी नोंदणी करणे अनिवार्य - केंद्र शासनाचे शिक्षण विभागाला आदेश

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.