Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

जाहिरात फलकाची पाहणी करून कारवाईसाठी मुंबई महापालिका परवाना विभागाकडून पथके स्थापन

संपूर्ण मुंबईतील जाहिरात फलकाची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या परवाना विभागाने पथके स्थापन केली आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 14, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
कृत्रिम पावसासाठी पालिका आता निविदा मागवणार; पाच देशी कंपन्या स्पर्धेत
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : संपूर्ण मुंबईतील जाहिरात फलकाची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या परवाना विभागाने पथके स्थापन केली आहेत. जाहिरात फलकांचा आकार नियमानुसार आहे का, डिजिटल फलक रात्री ११ वाजल्यानंतर बंद होतात का याची पाहणी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश या पथकाला देण्यात आले आहेत. तसेच चुकीची माहिती अहवालात दिल्यास पथकावरच कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. घाटकोपरमधील छेडानगर येथे जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईतील अनधिकृत जाहिरात फलक, त्यांचा महाकाय आकार आणि त्यातील एकूणच अनियमितता आदी प्रश्न ऐरणीवर आले. त्यामुळे गेल्या महिन्याभरात पालिका प्रशासनाने जाहिरात फलकांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तसेच अनधिकृत फलकांची माहितीही गोळा केली. मात्र आता ही माहिती तपासून पाहण्यासाठी पालिकेच्या परवाना विभागाने पथके तयार केली आहेत.

अप्पर मुख्य सचिवांच्या (गृह) दालनात १२ जून रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार पालिकेचे उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. या कामासाठी शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरासाठी तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यात परवाना विभागाचे निरीक्षक आणि विभाग कार्यालयांतील वरिष्ठ परवाना निरीक्षक यांचा समावेश आहे. जाहिरात मार्गदर्शक तत्त्वे २००८ नुसार डिजिटल फलक हे रात्री ११ नंतर बंद करणे अनिवार्य आहे. मात्र अनेक ठिकाणी जाहिरातदार या नियमाचा भंग करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेने हे पाऊल उचलले आहे. या पथकांनी रात्री आपापल्या कार्यक्षेत्रात फिरून जाहिरात फलकांचा आकार नियमानुसार आहे का, त्यावर क्यूआर कोड आहे का, तसेच डिजिटल जाहिरात फलक रात्री बंद होते का याची माहिती घ्यायची आहे. तसेच सात दिवसात अहवाल सादर करायचा आहे. या अहवालात चुकीची माहिती दिल्यास संपूर्ण पथकावरच कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Previous Post

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींच्या विक्रीवर कल्याण-डोंबिवलीत बंदी

Next Post

शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.