Lokrakshanay
Friday, May 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

NSG कमांडोचा राज ठाकरे यांना सवाल,“मुंबईवर २६/११ हल्ला झाला मी उत्तर प्रदेशचा असूनही महाराष्ट्रासाठी माझं रक्त सांडलं तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?”

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 7, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
NSG कमांडोचा राज ठाकरे यांना सवाल,“मुंबईवर २६/११  हल्ला झाला मी उत्तर प्रदेशचा असूनही महाराष्ट्रासाठी माझं रक्त सांडलं तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?”
Share on FacebookShare on Whatsapp

महाराष्ट्र : महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एक माजी एनएसजी कमांडोने थेट सवाल उपस्थित केला आहे. प्रवीण कुमार तेवतिया असे या माजी सैनिकाचे नाव असून, त्यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमधून १५० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले होते. प्रवीण तेवतिया यांनी त्यांच्या ट्विटर एक्स वरून  राज ठाकरेंना प्रश्न विचारले आहे. “मुंबईवर हल्ला झाला तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?” तसेच, “मी उत्तर प्रदेशचा असूनही महाराष्ट्रासाठी माझं रक्त सांडलं. देशाला भाषेच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करू नका,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या वक्तव्यामुळे हिंदीविरोधी वक्तव्यांवरून निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

या पोस्टसोबत त्यांनी स्वतःचा एक फोटोही शेअर केला आहे. यात ते मरीन कमांडो फोर्स (मार्कोस)च्या गणवेशात हसताना दिसत आहेत. त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटवर ‘UP’ असे स्पष्ट लिहिलेले आहे आणि त्यांच्या हातात रायफलही दिसत आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, “मी उत्तर प्रदेशचा आहे, पण मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं. ताज हॉटेल वाचवलं. २६/११ च्या हल्ल्यात मी मुंबई वाचवली. त्या वेळी राज ठाकरेंचे तथाकथित योद्धे कुठे होते?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच,”देशाचे भाषेच्या आधारे विभाजन करू नका. आनंदाला आणि माणुसकीला कोणतीही भाषा लागत नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे. “प्रवीण तेवतिया यांनी २६/११ च्या हल्ल्यात ताज हॉटेलमधून १५० हून अधिक लोकांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या थेट प्रतिक्रियेमुळे सध्या सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषावादात नवा राजकीय सूर आळवला गेला आहे. तेवतिया हे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्याच्या मोहिमेचे नेतृत्व करत होते. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत धाडसी कारवाई करत किमान १५० लोकांचे प्राण वाचवले. या मोहिमेदरम्यान प्रवीण यांना गंभीर जखमा झाल्या होत्या — चार गोळ्या लागल्या, तरीही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.

Previous Post

केडियांनी मागितली राज ठाकरेंची माफी; “मी केलेलं ते ट्विट..”

Next Post

एम.डी ड्रग्ज फॅक्टरीवर धाड; उत्तराखंडहून ३ आरोपी अटकेत

Next Post
एम.डी ड्रग्ज फॅक्टरीवर धाड; उत्तराखंडहून ३ आरोपी अटकेत

एम.डी ड्रग्ज फॅक्टरीवर धाड; उत्तराखंडहून ३ आरोपी अटकेत

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.