Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाकरे गटाच्या दिपेश म्हात्रे यांनी VVPAT मतमोजणीसाठी भरले लाखो रुपये

इतक्या मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार निवडून आलेच कले असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 30, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाकरे गटाच्या दिपेश म्हात्रे यांनी VVPAT मतमोजणीसाठी भरले लाखो रुपये
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात महायुतीचे उमेदवार बहुमतांनी विजयी झाले. दरम्यान या सगळ्या निकालावर महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यभरात महायुतीच्या विजयावर विरोधकांकडून मतमोजणीवर संशय उपस्थित केला जात आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या उमेदवाराने घेतलेल्या निर्णयामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. डाेंबिवली विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे बहुमताने विजयी झाले. या निकालावर विरोध दर्शवत ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे मतमोजणीवर शंका उपस्थित केली आहे. निवडणूकीत डोबिवलीतून म्हात्रे यांचा पराभव झाला. हा पराभव ईव्हीएम मशीनमुळे भोंगळ कारभारामुळे झाला आहे, असा गंभीर आरोप दिपेश म्हात्रे यांनी केला आहे. प्रतिस्पर्धी विजयी उमेदवार चव्हाण यांना मिळालेली मते आणि मताधिक्य याविषयी म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाकडे चौकशीचं आवाहन केलं आहे. व्हीव्ही पॅट मशीनमधील मतं मोजण्याकरीता म्हात्रे यांनी निवडणूक यंत्रणेकडे तब्बल ४ लाख ७२ हजार रुपये भरले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणेच दरम्यान राज्यभरात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या विषयी महाविकास आघाडीने शंका घेत ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप केला आहे. या आरोपापश्चात उद्धव सेनेकडून डोंबिवलीत आज विविध ठिकाणी बूथ लावण्यात आले आहे. त्याठिकाणी ईव्हीएम मशीनच्या विरोधात नागरीकांची स्वाक्षरी मोहीम घेतली जात आहे.

विधानसभा निवडणूकीच्या या रिंगणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अतीतटीटची लढत पाहायला मिळाली होती. या निवडणूकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि इतर पक्ष होते. इतक्या मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार निवडून आलेच कले असा सवाल उपस्थित केला जात आहे. निकालावर नाराजी व्यक्त करणाऱ्या विरोधकांच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत.

Previous Post

केईएम रुग्णालयात स्वतंत्र वेदना व्यवस्थापन शस्त्रक्रियागृह कार्यान्वित

Next Post

संजय राऊतांचा थेट सवाल; ‘ती 76 लाख मते कुठून आली…?’

Next Post
भाजपचे कृत्य, अधम आणि नीच प्रकारचं, म्हणून आम्ही जोडे मारो आंदोलन करणार – संजय राऊत

संजय राऊतांचा थेट सवाल; ‘ती 76 लाख मते कुठून आली…?’

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.