मुंबई : यंदा आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाने विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी शेकडो बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. या विठ्ठल भक्तांसाठी पंढरपूर येथील विठुरायाचे दर्शन घडवण्यासाठी ५ हजार २०० ज्यादा बसेस सोडल्या होत्या. त्याचा फायदा तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भक्तांनी घेतला. त्यातून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजारांचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहनमंत्री सरनाईक यांनी वारी कालावधीत मिळालेल्या एसटी महामंडळाच्या उत्पनाची माहिती दिली. विठुरायाचे दर्शन घडवण्यासाठी ५ हजार २०० ज्यादा बसेस सोडल्या होत्या. त्याचा फायदा तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भक्तांनी घेतला. त्यातून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा अधिक असल्याची माहिती दिली. या सर्व प्रवाशांची एसटीच्या चालक, वाहकांनी सुरक्षितपणे ने-आण करून त्यांना विठ्ठल दर्शन घडविल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आषाढी एकादशी निमित्त राज्यातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविक वारीसाठी येत असतात. या भाविकांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी यंदा एसटीने ३ ते १० जुलै दरम्यान, तब्बल ५ हजार २०० ज्यादा बसेस सोडल्या होत्या. या बसेसनी २१ हजार ४९९ फेऱ्या करून तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविकांची सुरक्षित ने-आण केली. त्यातून एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले, जे मागील वर्षी मिळालेल्या उत्पन्नापेक्षा ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांनी जास्त असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

