वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून गुवाहाटी येथे खेळवला जात आहे. भारतीय संघाला मालिक पराभवापासून वाचायचं असेल तर या सामन्यात विजय मिळवणं महत्त्वाचं असेल. दरम्यान भारताचा कर्णधार बदलला असून ऋषभ पंत संघाचं नेतृत्त्व करणार आहे. शुबमन गिलला पहिल्या कसोटीत मानेला दुखापत झाल्याने तो कसोटी संघातून बाहेर झाला आहे. तर कसोटी इतिहासात पहिल्यांदाच लंचब्रेकपूर्वी टीब्रेक होणार आहे.
पहिल्या सत्रात भारतीय संघाने विकेटसाठी प्रयत्न केले, पण काही कॅच ड्रॉप झाल्याचा संघाला फटका बसला. यानंतर अखेरीस बुमराहने २६व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मारक्रमला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

