ठाणे : महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आहे. जवळपास अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत ठाणे जिल्ह्यातून १४ लाख ६५ हजार ८७६ अर्ज दाखल झाले होते. त्यातील अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्यातून जवळपास १४,६५,८७६ महिलांनी अर्ज केले होते. त्यातील १४ लाख ४१ हजार ७९८ अर्ज स्विकारले गेले होती. यामधील २४ हजार ७८ अर्ज बाद करण्यात आले आहे. ठाणे प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील २४ हजार महिला अपात्र ठरल्या त्यांना आता इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान,ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांची ईकेवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहेत. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना केवायसी अनिवार्य केले आहे. योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटचे ४ दिवस उरले आहेत. तुम्हाला १८ नोव्हेंबरपर्यंत केवायसी करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करावेत.

