Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने छत्तीसगड येथील चार वेठबिगारांची सुटका

छत्तीसगड येथील चार जणांना भिवंडी येथील पडघा भागात डांबून त्यांना वेठबिगारी करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 5, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने छत्तीसगड येथील चार वेठबिगारांची सुटका
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : छत्तीसगड येथील चार जणांना भिवंडी येथील पडघा भागात डांबून त्यांना वेठबिगारी करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छत्तीसगड येथील सुरजपूरचे जिल्हाधिकारी रोहित व्यास यांनी याबाबत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ या वेठबिगारींचा शोध घेऊन त्यांची सुटका केली. इंद्रपाल जगन्नाथ सिंग (३०), विकेश उत्तम सिंग (१७), बादल सोवित सिंग (१४) आणि मनबोध धनि राम (४९) अशी या वेठबिगारींची नावे आहेत. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. छत्तीसगढ राज्यातील सुरजपुर जिल्ह्यात राजकुमारी सिंग राहतात. त्यांचे पती इंद्रपाल यांना मुंबई येथे एका ठेकेदाराने डांबून ठेवल्याची तक्रार त्यांनी सुरजपुर जिल्हाधिकारी रोहित व्यास यांच्याकडे केली होती. यानंतर त्यांनी तात्काळ संपूर्ण प्रकरणाची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिली. शिनगारे यांनी याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देऊन कारवाईचे निर्देश दिले. अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम इंद्रपाल यांच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो भिवंडी जवळील पडघा भागात असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी पडघा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध घेण्यास सुरूवात केली. बोअरवेलसाठी खड्डे खणण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी इंद्रपाल यांचा शोध लागला. इंद्रपाल याच्यासोबत विकेश, बादल आणि मनबोध हे देखील आढळून आले. त्यांची चौकशी केली असता, ते कविन मनिवेल यांच्याकडे बोअरवेलच्या कामासाठी खड्डे खोदण्याचे आणि विद्युत जोडणी करण्याचे काम करतात, असे समजले.

कामगारांनी सांगितले की, कविन याने त्यांना चार महिन्यापासून वेतन दिले नाही. वेतनाचे पैसे मागितले असता त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करत खड्डे खणण्याचे काम करून घेतले जात आहे. आम्ही आमच्या घरी जातो, असे सांगितल्यानंतरही आम्हाला घरी सोडले जात नव्हते. यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी संबंधित ठेकेदार कविन मनिवेल यांच्या विरोधात वेठबिगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. तर चारही जणांची सुटका करण्याची कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Previous Post

तुम्ही मनुके खात असाल तर त्याचे जाणून घ्या ४ आश्चर्यकारक फायदे

Next Post

लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवूच, उद्धव ठाकरे यांचे थेट पंतप्रधान मोदींना आव्हान

Next Post
लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवूच, उद्धव ठाकरे यांचे थेट पंतप्रधान मोदींना आव्हान

लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवूच, उद्धव ठाकरे यांचे थेट पंतप्रधान मोदींना आव्हान

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.