Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवूच, उद्धव ठाकरे यांचे थेट पंतप्रधान मोदींना आव्हान

ज्या गद्दारांनी आपले सरकार पाडले त्यांच्या नाकावर टिच्चून पुन्हा एकदा शिवसेनेचे सरकार स्थापन करु आणि आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवतो असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 5, 2024
in ताज्या बातम्या, रत्नागिरी
लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवूच, उद्धव ठाकरे यांचे थेट पंतप्रधान मोदींना आव्हान
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी : ‘ज्या गद्दारांनी आपले सरकार पडले, त्यांच्या नाकावर टिच्चून मी पुन्हा एकदा शिवसेनेचे सरकार स्थापन करून येत्या लोकसभा निवडणुकीत लाल किल्ल्यावर फडकवून दाखवतो,’ असे खुले आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. ‘तुम्ही वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांना निवडून दिले नसते, तर इकडे सगळी गुंडागर्दी आणि गँगवार झाले असते,’ अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी पहिल्या दिवशी सावंतवाडी, कुडाळ, मालवण, कणकवली या चार सभा झाल्या. या सगळ्या सभांमधून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, दीपक केसरकर यांच्यावर शरसंधान केले. ‘सत्ताधारी पक्षांत गँगवॉर सुरू झाले आहे. सगळ्यात जास्त निवडणूक रोखे सहा की आठ हजार कोटी रुपये, हे भारतीय जनता पक्षाकडे आहेत. ‘कोणाला पैसे दिलेत, तर याद राखा. तुमच्या सगळ्या भानगडी बाहेर काढू,’ अशा धमक्या उद्योगपतींना दिल्या जात आहेत आणि त्यांच्याकडून खंडण्या वसूल केल्या जात आहेत,’ असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

‘फयान, तौक्ते, महापूर अशी मोठी संकटे कोकणावर आली. त्या वेळी हे कुठेच आले नव्हते; पण अचानक त्यांना आठवण झाली की छत्रपती शिवाजी महाराज नावाची व्यक्ती आपल्या देशात मोठी होऊन गेली आणि त्यांनी आरमाराची स्थापना केली. हा सिंधुदुर्ग मतदारसंघ जिंकण्यासाठीची ही ढोंगे आहेत,’ अशा शब्दांत ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले.

Previous Post

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने छत्तीसगड येथील चार वेठबिगारांची सुटका

Next Post

ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीत बंदुकीचे सर्वाधिक परवाने; बंदूक स्वसंरक्षणासाठी की खोट्या प्रतिष्ठेसाठी?

Next Post
ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीत बंदुकीचे सर्वाधिक परवाने; बंदूक स्वसंरक्षणासाठी की खोट्या प्रतिष्ठेसाठी?

ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीत बंदुकीचे सर्वाधिक परवाने; बंदूक स्वसंरक्षणासाठी की खोट्या प्रतिष्ठेसाठी?

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.