Lokrakshanay
Saturday, May 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

अनधिकृत बांधकामांवर जीपीएस माध्यमातून ठेवणार नजर

शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नाही.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 11, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
अनधिकृत बांधकामांवर जीपीएस माध्यमातून  ठेवणार नजर
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी यापुढे जीपीएस सॅटेलाईट प्रणालीचा अवलंब करावा. अनधिकृत बांधकाम शहरात होत असल्याचे निदर्शनास येताच ते तत्काळ निष्कसित करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. वनविभाग, खार जमिनीच्या जागेवर नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करुनही कारवाई न झाल्यास त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्त सौरव राव यांनी यावेळी दिल्या. शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नाही. विशेष करून खाडीच्या पलिकडे कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली असून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कळव्यातील अनाधिकृत बांधकामे, नालेसफाई तसेच पाणीपट्टी वसुलीचीचा आढावा घेतला.

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरात झालेली व होत असलेली विकास कामे तसेच संपूर्ण शहराची भौगोलिक परिस्थिती, कळवा पूर्व परिसरातील पारसिक डोंगर व तीन बाजूंनी वेढलेला खाडी किनारा या दृष्टीने शहराचे क्षेत्रफळ आदी सर्व माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त सौरभ राव यांनी जाणून घेतली. सद्यस्थितीत कळवा प्रभाग समितीच्या माध्यमातून मालमत्ता करवसुली ७५ टक्के व पाणीपट्टी ६२ टक्के असल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त करीत पाणीपट्टी व मालमत्ता करवसुली १०० टक्के झालीच पाहिजे या दृष्टीने कृती आराखडा करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी यावेळी दिले. प्रभाग समितीत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेवून ज्या तक्रारींचा निपटारा प्रभाग समिती स्तरावर करणे शक्य आहे तो जलदगतीने करावा. तसेच तक्रारीचा निपटारा झाल्यावर संबंधित तक्रारदाराला त्याची माहिती देण्यात यावी. तसेच ज्या तक्रारी मुख्यालयामार्फत सोडविणे आवश्यक आहे, त्या संबंधित विभागाकडे वर्ग कराव्यात. शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकाम/ अतिक्रमण यांचा मासिक अहवाल तयार करुन तो सादर करण्याचे निर्देशही सहाय्यक आयुक्तांना सदर बैठकीत देण्यात आले.

Previous Post

वकील उज्ज्वल निकम यांचा गौप्यस्फोट; मंदिराबाहेर मिळणारे लाल धागे ठरतात दहशतवाद्यांचे कवच

Next Post

मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय; आता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत

Next Post
मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय; आता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत

मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय; आता पावसाळ्यातही लोकल प्रवास होईल सुरळीत

BreakingNews

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.