Lokrakshanay
Monday, May 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

शिवसेनेतील दिग्गज नेते ज्या माणसामुळे बाहेर गेले, त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला..!

शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 18, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
शिवसेनेतील दिग्गज नेते ज्या माणसामुळे बाहेर गेले, त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला..!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंमधलं वैर जगजाहीर आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडून साधारण दोन दशकं होऊन गेली तरी दोन्ही चुलत भावांमधून विस्तवही जात नाही. मोजक्या कौटुंबिक कार्यक्रमांचा अपवाद वगळता दोघांनी एकमेकांसोबत येणंही टाळलंय. ठाकरे बंधूंमधल्या वादाचा आता पुढचा अध्याय सुरु झालाय. काही दिवसांपूर्वी दिशा सालियन आरोपांवरुन आदित्य ठाकरेंची बाजू घेणाऱ्या शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्याचा संदर्भ शर्मिला ठाकरेंच्या टीकेला आहे.
ज्या माणसामुळे शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना बाहेर पडावं लागलं. त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटलाय असा टोला शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. विक्रोळीत मनसेच्यावतीने महोत्सावाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात बोलताना शर्मिला ठाकरे यांनी ‘या महिन्याच्या 10 तारखेला एक वर्तुळ पूर्ण झालं. शिवसेनेतील दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं, त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला’ असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. शिवसेना आमदार अपात्रता निकालांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. त्यात शर्मिला ठाकरेंनी एक वर्तुळ पूर्ण झालं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना शिंदे गटाला शिवसेनेची मान्यता दिली. राहुल नार्वेकरांच्या या निकालावरूनच शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हापासून ठाकरे कुटुंबीयातील राजकीय वाद सार्वजनिक व्यासपीठावरूनही दिसून आले आहेत. आता या राजकीय वादांमध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर टीका केली आहे.
दिशा सॅलियन प्रकरणात शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली होती, मात्र शिवसेना आमदार अपात्रता निकालानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत भावनिक असणाऱ्या विषयावर शर्मिलांनी टोला लगावला. त्यामुळे यानिमित्तानं राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे वाद पुन्हा भडकण्याची शक्यता आहे.

Previous Post

वाहतूक विभागाकडून कल्याण शहरातील २२ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध

Next Post

डॉ. सायरस के. मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून प्रतिष्ठित “भारतीय नेत्र शल्यचिकित्सक” पुरस्कार

Next Post
डॉ. सायरस के. मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून प्रतिष्ठित “भारतीय नेत्र शल्यचिकित्सक” पुरस्कार

डॉ. सायरस के. मेहता यांना राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून प्रतिष्ठित "भारतीय नेत्र शल्यचिकित्सक" पुरस्कार

BreakingNews

डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे ७/१२ मागितल्यास पेट्रोल पंपांवर कारवाई

LPG गॅस २५ दिवसांपूर्वी संपला? जाणून घ्या ग्राहकांसाठी उपलब्ध ३ महत्त्वाचे पर्याय

पालघरमध्ये ४,१५० कोटींचे अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्स; महाराष्ट्राला मिळणार जागतिक सागरी हबची ओळख

गावदेवी भाजी मंडई दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना मिळणार १० लाखांची मदत

‘कॉकरोच जनता पार्टी’चं X अकाउंट भारतात ब्लॉक? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर दणदणाट; १०८ कोटींच्या कमाईसह नवा इतिहास

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.