Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

ब्रिटिश वारशाचा अंत, ‘सिंदूर’ उड्डाणपूल मुंबईकरांच्या सेवेत!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मशीद बंदर, मुंबई येथे 'सिंदूर' उड्डाणपुलाचे लोकार्पण केले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 11, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
ब्रिटिश वारशाचा अंत, ‘सिंदूर’ उड्डाणपूल मुंबईकरांच्या सेवेत!
Share on FacebookShare on Whatsapp

दिडशे वर्षांपासून या पुलाला कर्नाक पूल म्हणून ओळख होती. कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा असल्याने त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहासातील काळे अध्याय संपायला हवेत, त्याच्या खुणा मिटायला हव्यात’ असे आवाहन केले होते. यालाच अनुसरून कर्नाक पुलाचे नाव बदलण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादी अड्डे नष्ट केले. सेनेच्या या अतुलनीय कामगिरीमुळे सर्वानुमते ‘मनपा’ने या पुलाला ‘सिंदूर’ हे नाव दिले, ही आनंदाची गोष्ट आहे. या पुलाची एकूण लांबी 328 मीटर असून रेल्वेच्या हद्दीत 70 मीटर आहे. यासोबतच मुंबईतील वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

रेल्वेमार्गावरील पूल असल्याने अनेक अडचणी येत होत्या, या अडचणींवर मात करून मुंबई मनपाने कमी वेळात उत्कृष्ट बांधकाम केल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनपाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे
✅मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी डी’ मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व-पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा.
✅पुलाच्या पुनर्बांधणीमुळे सुमारे 10 वर्षापासून बाधित झालेली पूर्व-पश्चिम वाहतूक व्यवस्था सुलभ होणार.
✅पूल कार्यान्वित झाल्यावर पी डी’ मेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत.
✅पुलाच्या पुनर्बांधणीने युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक होणार सुलभ.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, आ. मनिषा कायंदे उपस्थित होते.

Previous Post

नव्या पिढीसाठी समतोल आणि दूरदृष्टी असलेले सुधारित युवा धोरण आखले जाणार

Next Post

ॲप आधारित वाहनांना कायद्याचे पालन करावेच लागेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश

Next Post
ॲप आधारित वाहनांना कायद्याचे पालन करावेच लागेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश

ॲप आधारित वाहनांना कायद्याचे पालन करावेच लागेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.