कल्याण : कल्याणमध्ये बेकायदा गुटखा विक्री करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांकडून करण्यात आली आहे. दरम्यान सर्वसामान्य वसतीमध्ये अवैध्यरित्या हे रॅकेट सुरु होतं. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पोलिसांनी या गुटखा रॅकेटला ताब्यात घेतलं आहे. बेकादेशीर सुरु असलेल्या गुटखा विक्रीच्या गोदामावर छापा टाकत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांच्य़ा नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई कऱण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत. मात्र कल्याण डाेंबिवलीत अनेक ठिकाणी गुटख्यासह गांजा, चरस खुले आम विकले जात आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. बेकायदा चालणारे धंदे त्यांना मिळणारं अभय या सगळ्यामुळे परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. डिसीपी कार्यालयातील दादा ज्या माफियांना सपोर्ट असतो. त्या सगळ्या बेकायदेशीर कामांना दुर्लक्षित केलं जातं. दादाचा वरदहस्त असलेल्यांच्या विरोधात ही कारवाई कधी होणार असा सवाल देखील उपस्थित केले जात आहेत.
कल्याणच्या पश्चिमेतील भानूनगर परिसरात डीपीसी स्कॉड आणि महात्मा फुले पोलिस ठाण्यातील पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकला. दरम्यान या गोदामात जवळपास ७ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. कारवाईनंतर गुटखा माफिया जहांगीर शेख, जिशान खान आणि मुनावर खान या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे, या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मुनावर खान हा या रॅकेटचा म्होरक्या असल्याचे सांगण्यात येत आहे. हा बेकायदेशीर गुटखा कल्याण स्टेशन परिसरातील टपऱ्यांवर पुरवला जातो. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर भानूनगर परिसरातील वातावरण अत्यत संवेदनशील झाले आहे. या सगळ्या प्रकरणाची कारवाई कल्याणचे डीपीसी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डीपीसी यांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. डीपीसींनी काही महिन्यांपूर्वीच कल्याणचा पदभार घेतला आहे. डीसीपी कार्यालयात दादा जो अनेक वर्षापासून डीपीसी कार्यालयात ठाण मांडून बसला आहे. त्या दादांच्या आशीर्वादाने कल्याण डोंबिवलीतील अनैतिक धंदे सुरु आहेत. हा गुटख्याचा धंदा देखील सुरु होता. ही कारवाई उल्लेखनीय आहे. मात्र दादांचा आशीर्वाद ज्या धंद्यांना आहे. त्या विरोधात कारवाई का केली जात नाही. अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेले दादावर कोणाचा वरदहस्त आहे याची चर्चा रंगली आहे. सर्व पोलिसांच्या बदल्या होत होत्या. दादांची बदली का होत नाही. दादा एकाच ठिकाणी एकाच कार्यालयात कार्यरत आहेत. असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.