Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मविआत जागावाटपाची तयारी; ठाकरे गट विधानसभेला मुंबईतील इतक्याच जागा काँग्रेसला सोडणार?

ठाकरे गट मुंबईतील ३६ पैकी २५ ते २८ जागा लढविण्याची तयारी करत असल्याचे समजते आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 18, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
मविआत जागावाटपाची तयारी; ठाकरे गट विधानसभेला मुंबईतील इतक्याच जागा काँग्रेसला सोडणार?
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : लोकसभेत महायुतीला दणका दिल्यानंतर आता महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. मविआतील तिन्ही पक्ष ९० ते ९५ जागा लढविण्याची शक्यता आहे. परंतू या जागा कोणत्या असतील यावर ओढाताण होण्याची शक्यता आहे. ठाकरे शिवसेनेला मुंबई, कोकण; राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्र आणि काँग्रेसला विदर्भ, मराठवाडा या भागात आपले वर्चस्व ठेवायचे आहे. अशातच या भागातील जागांवर देखील तिन्ही पक्षांचा डोळा असणार आहे. यापैकी महत्वाचा असलेला मुंबई भाग शिवसेनाला हवा आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मुंबईतील बहुतांश जागा ठाकरे गट आपल्याकडे ठेवण्याची साधक बाधक चर्चा झाल्याचे समजते आहे. विधानसभेच्या ज्या जागांवर जो पक्ष मजबूत असेल त्याला ती जागा सोडण्यात यावी, यावर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती आहे. मात्र काँग्रेस यात नसल्याने व मुंबईत एकतर ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांचेच वर्चस्व असल्याने आता ठाकरे मुंबईतील एकूण ३६ जागांपैकी काँग्रेसला किती जागा सोडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गट मुंबईतील ३६ पैकी २५ ते २८ जागा लढविण्याची तयारी करत असल्याचे समजते आहे. भाजपसोबत मैत्री असताना ठाकरे शिवसेनेने गेल्यावेळी १४ जागा जिंकल्या होत्या. यापैकी आठ आमदार आता ठाकरेंसोबत तर सहा आमदार शिंदेंसोबत आहेत. यापैकी एक आमदार आता खासदार झाले आहेत. यामुळे दोन्ही गटाकडून या जागांवर नव्या उमेदवारांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई, दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २०१९ मध्ये काँग्रेसचे चार आमदार आले होते. त्यापैकी वर्षा गायकवाड आता खासदार आहेत. तर राष्ट्रवादीचा एक आमदार निवडून आला होता. हा आमदार आता महायुतीसोबत आहे. यामुळे इथेही काही प्रमाणात तडजोड होण्याची शक्यता आहे. लोकसभेचे यश पाहता ठाकरे गट महापालिका निवडणुकीची बालेकिल्ल्यातील तयारी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीशी उर्वरित राज्यातील जागांवर तडजोड करून मुंबईत जादाच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Previous Post

ठाणे आणि मुलुंड शहरांचा विस्तार; प्रवासी भार कमी करण्यासाठी नवीन स्थानकाचा प्रस्ताव

Next Post

उच्च न्यायालयाचा विशाळगडावर निष्कासन कारवाई अवमान

Next Post
उच्च न्यायालयाचा विशाळगडावर निष्कासन कारवाई अवमान

उच्च न्यायालयाचा विशाळगडावर निष्कासन कारवाई अवमान

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.