मुंबई : राज्यात लाडकी बहीण योजनेत ३२ कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. तर राज्यातील बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. लाडकी बहीणसंदर्भात आतापर्यंतचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सरकारी वसुली सुरु होणार आहे. तर राज्यातील सरकारने स्वतः ही माहिती दिली आहे. राज्यात भाजपा सरकारच्या योजनेत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीच मोठा भ्रष्टाचार केला आहे, असे दिसत आहे.राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकीकडे महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असताना, दुसरीकडे भाजपा सरकारने ३२ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती दिली आहे.शासनाचे नुकसान झाल्याची कबुली सरकारनेच दिली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजना संदर्भात आतापर्यंतचा मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ३२ कोटींच्या नुकसानाची भरपाई अधिकारी व कर्मचारी यांच्यासकडून केली जाणार आहे. वसुली सुरु होणार आहे, असे सरकारने माहिती दिली आहे.
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची ३२ कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. राज्यातील अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे तब्बल ३२ कोटींचे नुकसान करण्यात आले आहे. राज्यामध्ये २६ लाख अपात्र महिला आणि १४ हजार २९७ पुरुषांनी लाभ घेतल्याची सरकारनेच माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकीकडे महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असताना, दुसरीकडे सरकराने तब्बल ३२ कोटी रुपयांचे नुकसान दिल्याची झाल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. राज्यातील अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे ३२ कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. राज्यामधील 26 लाख अपात्र महिला आणि १४ हजार २९७ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती मिळाली आहे. अपात्र लाभार्थ्यांमध्ये ९५०० शासकीय कर्मचाऱयांचाही समावेश असल्याचे उघड झालं आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवलेल्या शासकीय कर्मचारी आणि पुरुषांकडून लाभाची रक्कम वसुल केली जाणार असल्याची माहिती सरकारने लेखी स्वरुपात दिली आहे.

