मुंबई : राज्यातील बहुतांश शाळांना या आठवड्यांमध्ये एक अतिरिक्त सुट्टी मिळणार आहे. असं असतानाच आता राज्यात असून एक सुट्टी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. खरं तर १५ तारखेला राज्यातील २९ महानगरपालिका क्षेत्रात मतदान पार पडत आहे. मतदानासाठी अनेक ठिकाणी शाळांमध्येच मतदार केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी शाळा भरणार नाहीत. मात्र आता अशी एक मागणी करण्यात आली आहे की ज्यामुळे १६ तारखेलाही मुलांना शाळेत पाठवावं लागणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. १६ तारखेला सुट्टी दिली तर अनेक शाळा १४ तारखेपासूनच बंद असतील. १४ तारखेला संक्रांतीची सुट्टी आहे. त्यानंतर १५ ला मतदान आणि १६ ला सध्याच्या मागणीनुसार सुट्टी जाहीर झाली तर शिक्षक नसल्याने आणि निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण यंत्रणांना काम संपवण्यासाठी शाळांचा परिसर वापरला जाईल. त्यानंतर १७ तारखेला शनिवार असून १८ तारखेला रविवार आहे. त्यामुळे मुलांना पाच दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

