Lokrakshanay
Sunday, June 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईत महापालिका आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित

देशभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रामुख्याने जिल्हाधिकारी यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित करण्यात येते.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 9, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
कोट्यवधींचे प्रकल्प पण महापालिकेच्या महसूलात बदल नाही, उलट खर्च दोन लाख कोटी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आता मुंबईत मात्र ही जबाबदारी आणि अधिकार मुंबई महापालिका आयुक्तांवर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मुंबई महापालिका आयुक्तांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

आगामी विधानसभा निवडणूक ही मुंबई महापालिका आयुक्तांना पार पाडावी लागणार आहे. देशभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रामुख्याने जिल्हाधिकारी यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोषित करण्यात येते. मात्र, चेन्नई आणि बेंगळूरु या शहरामध्ये सर्व कारभार महापालिकांच्या अखत्यारित येत असल्याने तेथे निवडणुकांची जबाबदारी आणि अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महापालिका आयुक्तांवर सोपविण्यात आले आहेत. या दोन्ही शहरात उपक्रम यशस्वी ठरलेला हा उपक्रम आता मुंबईतही राबविण्यात येणार आहे. मुंबईत शहर जिल्हा आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी घोषित करण्यात आले असून आजवर तेच निवडणुका घेत होते. मात्र, मुंबईत सर्व यंत्रणा पालिकेकडे असल्याने निवडणुका घेताना जिल्हाधिकाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांकडे देण्यात आली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली आहे.

Previous Post

डोंबिवलीत बोगस कंपनी स्थापन करून गुंतवणूकदारांची १० कोटींची फसवणूक

Next Post

पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने घोडबंदर परिसरात टंचाईची समस्या

Next Post
धरण क्षेत्रातील पावसामुळे सिडकोने वसाहतींमधील २० टक्के पाणीकपात घेतली मागे

पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने घोडबंदर परिसरात टंचाईची समस्या

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.