Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

पिण्याच्या पाण्यात नाल्याचे पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पिण्याचे पाणी येण्याच्या वेळेचा रात्रीचा खेळ चालणाऱ्या उल्हासनगरातील शापित भागात पिण्याच्या पाण्यात चक्क नालीचे पाणी येऊ लागले आहे.हे गढूळ।पाणी बॉटल्स मध्ये भरून नागरिकांनी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा कार्यालयात धाव घेतली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 19, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
पिण्याच्या पाण्यात नाल्याचे पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Share on FacebookShare on Whatsapp

उल्हासनगर : पिण्याचे पाणी येण्याच्या वेळेचा रात्रीचा खेळ चालणाऱ्या उल्हासनगरातील शापित भागात पिण्याच्या पाण्यात चक्क नालीचे पाणी येऊ लागले आहे.हे गढूळ।पाणी बॉटल्स मध्ये भरून नागरिकांनी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा कार्यालयात धाव घेतली आहे. सुभाष टेकडी परिसरातील अनेक भागात पाणी सोडण्याची वेळ ही निश्चित नसल्याने नागरिकांना आणि विशेषतः महिलांवर जागता पहारा करण्याची वेळ येत आहे.या भागातील अनेक समाजसेवक हे मासमीडियावर पाण्याची वेळ व्हायरल करत असल्याने त्यानुसार झोपमोड करून नागरिकांना पाण्याची प्रतिक्षाकरावी लागत आहे.याबाबत अनेकदा आंदोलने करण्यात आली असताना अधिकाऱ्यांना एकदाची पाण्याची वेळ निश्चित का करता येत नाही हा संशोधनाचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वीच ड्रेनेजचे खोदकाम करताना पाण्याची लाईन तुटल्याने आठवडाभर नागरिकांचा घसा कोरडा राहिला होता.नागरिकांनी आंदोलन केल्यावर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर,पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी त्या स्पॉटची पाहणी करून लाईन दुरुस्त केली होती.

आता गेल्या तीन दिवसांपासून दहा चाळ नालंदा शाळे जवळील नागरिकांना पिण्याच्या पाण्यामध्ये नालीचे पाणी येत आहे.या पाण्याचा प्रचंड प्रमाणात वास येत असून नागरिकांनी हे पाणी प्यायचे कसे?असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.सतीश किराणा स्टोर जवळ काही लोकांनी नाली मध्ये पाण्याची लाईन घेतली असून अधिकारी वर्ग तक्रार करूनही लक्ष देत नसून त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲड.प्रशांत चंदनशिव यांनी केला आहे. तसेच काही ठिकाणी येणाऱ्या पाण्यात बारीक खडी येत आहेत.अत्यावश्यक सेवा असूनही अधिकारी वर्ग लक्ष देत नसून कुठलीही तपासणी केली जात नसल्याची खंत ॲड.प्रशांत चंदनशिव यांनी व्यक्त केली आहे. चंदनशिव यांनी नागरिकांसोबत हे पिण्याच्या पाण्याच्या येणारे नालीचे पाणी बॉटल्स मध्ये भरून महानगरपालिकेत उपअभियंता आर.एन.ठाकरे यांना दाखवल्यावर हे पाणी कनिष्ठ अभियंता हरेश मिरकुटे यांच्या सुपूर्द केले आहे.त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Previous Post

४६९ कोटींची पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून कमाई

Next Post

१३५ कोटीचे अमली पदार्थ केले जप्त; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची मोठी कारवाई

Next Post
कामावरून काढून टाकल्याचा राग, कंपनीच्या व्यवस्थापकावर प्राणघातक हल्ला; चौघा हल्लेखोरांपैकी एकाला अटक

१३५ कोटीचे अमली पदार्थ केले जप्त; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची मोठी कारवाई

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.