Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

विनातिकीट फिरणाऱ्यांना १६ कोटींचा फटका! मध्य रेल्वेने ४० दिवसांत पकडले २ लाख प्रवासी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 17, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
विनातिकीट फिरणाऱ्यांना १६ कोटींचा फटका! मध्य रेल्वेने ४० दिवसांत पकडले २ लाख प्रवासी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मध्य रेल्वेने विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात राबविलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत मोठी कारवाई करत १ जून ते ९ जुलै २०२६ या कालावधीत २ लाख १० हजार प्रवाशांकडून तब्बल १६.१६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, १ जून ते १९ जून या कालावधीत तिकीट तपासणी पथकाने विनातिकीट व अनियमित प्रवासाची १.१४ लाख प्रकरणे उघडकीस आणली. त्यावेळी प्रति प्रवासी २५० रुपये दंड आकारण्यात येत असून, या कालावधीत ६.१५ कोटी रुपये वसूल करण्यात आले. त्यानंतर १९ जूनपासून विनातिकीट प्रवासावरील किमान दंडाची रक्कम ५०० रुपये करण्यात आली. दंड वाढवल्यानंतर २० जून ते ९ जुलै या कालावधीत रेल्वेने ६.९८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. या मोहिमेद्वारे विनातिकीट प्रवासावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याबरोबरच रेल्वेचा महसूल सुरक्षित करण्यावर भर देण्यात आला आहे.

मध्य रेल्वेकडून मुंबई विभागात मेल-एक्सप्रेस तसेच उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये नियमितपणे विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या कारवाईमुळे केवळ विनातिकीट किंवा अनियमित तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई होत नाही, तर इतर प्रवाशांनाही नियमांचे पालन करण्याचा संदेश मिळतो. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, प्रवाशांकडून मिळणारा तिकीट महसूल हा प्रवासी सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरला जातो. त्यामुळे विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेच्या उत्पन्नावर थेट परिणाम होतो. प्रवासादरम्यान दंड आणि अन्य गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक प्रवाशाने वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, तसेच जबाबदारीने आणि नियमांचे पालन करून रेल्वे सेवांचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. विनातिकीट प्रवासाबाबत ‘शून्य सहनशीलता’ धोरण कायम असल्याचेही रेल्वे प्रशासनाने पुन्हा स्पष्ट केले आहे.

 

Previous Post

मलबार हिल निसर्ग उन्नत मार्ग ऑगस्टअखेरपर्यंत पर्यटकांसाठी बंद!

Next Post

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

Next Post
डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

BreakingNews

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

विनातिकीट फिरणाऱ्यांना १६ कोटींचा फटका! मध्य रेल्वेने ४० दिवसांत पकडले २ लाख प्रवासी

मलबार हिल निसर्ग उन्नत मार्ग ऑगस्टअखेरपर्यंत पर्यटकांसाठी बंद!

डॉ. निलेश साबळेची नव्या शोची चाहूल; ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच’ पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता

पारशी डेअरीवर FDA ची मोठी पकड! दूध भेसळप्रकरणी परवाना निलंबित, दोघांना बेड्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.