नवी दिल्ली : आपत्कालीन परिस्थितीत फिर्यादी मध्यरात्रीही सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतात. नागरिकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आता चोवीस तास उघडे राहतील, अशी माहिती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी गुड न्यूज दिली.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, जर एखाद्या नागरिकाला कायदेशीर आणीबाणीचा सामना करावा लागला किंवा तपास यंत्रणांकडून अवेळी अटकेची धमकी दिली गेली, तर ती व्यक्ती आपल्या मूलभूत अधिकारांच्या आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी मध्यरात्रीही घटनात्मक न्यायालयांकडे सुनावणीची मागणी करू शकेल. माझा प्रयत्न सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना जनतेची न्यायालये बनवण्याचा आहे, जेणेकरून कायदेशीर आणीबाणीच्या वेळी कोणत्याही क्षणी न्यायालयाशी संपर्क साधता येईल.

