वृत्तसंस्था : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच एक महत्त्वाचा नियम आणण्याची तयारीत आहे. जर एखाद्या ग्राहकाने फोन लोनवर खरेदी केला असेल आणि या फोनचे EMI भरले नाही तर बँक किंवा लोन देणारी कंपनी तो फोन रिमोटच्या सहाय्याने लॉक करु शकते. देशातील कर्जाचा वाढता भार थांबवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र या निमयावर ग्राहक संरक्षण हक्काने आक्षेप नोंदवला आहे.
मागील वर्षी आरबीआयने बँका आणि NBFCsना फोन अॅप्सद्वारे डिफॉल्टर्सना लॉक करण्याची पद्धत थांबवण्यास सांगितले होते. परंतु आता, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, वित्तीय संस्थांशी चर्चा केल्यानंतर आरबीआयने आपला दृष्टिकोन बदलला आहे आणि येत्या काही महिन्यांत फेअर प्रॅक्टिसेस कोड अपडेट करू शकते.
- फोन लॉक करण्याआधी ग्राहकांची परवानगी गरजेची आहे.
- फोन लॉक केल्यानंतरही ग्राहकांच्या वैयक्तीक डेटाचा अॅक्सेस घेता येणार नाही.

