मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज आमदारकीचा शेवटचा दिवस. दरम्यान त्यांच्या निरोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी पक्षात येणाची ऑफर दिली आहे. २०२९ पर्यंत विरोधी बाकावर बसण्याचा आम्हाला काही स्कोप नाही. पण तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप आहे, असं म्हणत त्यांनी थेट सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यांच्या या विधानाने सभागृहात एकचं हशा पिकला.
अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम केलं. त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, अर्थात त्याच पदावर असण्याची काही आवश्यकता नाही. आता असं म्हटलं की पळवापळव केली असं म्हणतात. आम्हाला तिकडे येण्याला काही स्कोप नाही, तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप आहे, असं त्यांनी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
