मुंबई : अंधेरीतील पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाचा पादचारी पूल आता पूर्णपणे फेरीवाला-मुक्त झाला आहे. पुलाची निर्मिती झाल्यापासून येथे फेरीवाल्यांनी बेकायदेशीर पथारी मांडली होती. त्यामुळे पादचारी मार्ग अरुंद होत होता, गर्दी वाढत होती आणि अनेकदा नागरिकांशी वादावादी होत होती. काही महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. महिलांच्या तक्रारींची दखल घेत अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांनी आपल्या पथकासह येथे विशेष कारवाई करून सर्व फेरीवाल्यांना हटवले. या कारवाईनंतर पूल आता मोकळा झाला असून नागरिक निर्धास्तपणे, विनाअडथळा ये-जा करत आहेत. नागरिकांकडून या कारवाईचे जोरदार स्वागत होत असून, पादचारी प्रवासाला दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मुख्य पादचारी पूल प्रशासनाकडून अखेर अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्त करण्यात आला आहे. हा पादचारी पूल झाल्यापासूनच फेरीवाल्यांकडून पुलावर होणारी गर्दी, मुलींचा विनयभंग, छेडछाड आणि हाणामारीच्या वाढत्या प्रकारांसंबंधात सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत अंधेरी पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश माचिंद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुलावरील सर्व अनधिकृत फेरीवाले हटवले. या कारवाईमुळे हा मुंबईतील पहिला रेल्वे पादचारी पूल आहे. ज्या पूलाने आता मोकळा श्वास घेतला आहे. फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर जागा व्यापल्याने सर्वसामान्यांना चालण्यासाठी मोठी अडचण ठरत होती. आता पूल मोकळा झाल्याने आणि पोलिसांनी गस्त वाढवल्याने पादचारी आणि विशेषतः महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

