Lokrakshanay
Tuesday, June 9, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

४ मे पासून राज्यभर निदर्शने करण्याची संघटनांची चेतावणी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 21, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १ मेपासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला आहे. या निर्णयानुसार मराठी भाषा लिहिता, वाचता किंवा समजत नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो चालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत तो तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा ४ मेपासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संघटनांच्या मते, रिक्षा-टॅक्सी चालकांना परवाने देताना आधीच १५ वर्षांच्या वास्तव्यासह पोलिस पडताळणीसारख्या कडक अटी लागू केल्या जातात. शहरांमध्ये सुमारे १५ हजार आणि ग्रामीण भागात सुमारे ५ हजार रुपये शुल्क भरून चालक परवाना घेतात. बहुतांश चालक स्वतःचे भांडवल किंवा कर्ज घेऊन वाहन खरेदी करून उपजीविका करतात. त्यामुळे या नव्या निर्णयामुळे त्यांच्या रोजगारावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, ओला-उबेरसारख्या अॅप-आधारित सेवांवर समान नियम लागू नसल्याचा आरोप करत, हा निर्णय दुहेरी निकष दर्शवणारा असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. भाषेच्या आधारे उपजीविका हिरावून घेणे योग्य नाही, असा मुद्दा उपस्थित करत संघटनांनी सरकारने सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणीही केली आहे.

Previous Post

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

Next Post

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

Next Post
ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

ठाणे पोलिसांचा 'खाकी'ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

BreakingNews

इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा भडकला; भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला

पुणेकरांनो, सावधान! महापालिका पुढील ३ महिने करणार ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा?

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत! – बच्चू कडूंचे विधान

इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीला नवे बळ!

आता ठरावीक वजनाच्या पॅकिंगमध्येच मिळणार खाद्यतेल! – केंद्र सरकार

मुंबई मेट्रो १ ला १२ वर्षे पूर्ण; १२५ कोटी प्रवाशांचा टप्पा पार!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.