Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

धनगर समाजाला एसटी प्रवगार्तून आरक्षण देण्याचा जीआर काढू नका- नरहरी झिरवळ

आता मराठा-ओबीसी वादानंतर धनगर-आदिवासी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 30, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
धनगर समाजाला एसटी प्रवगार्तून आरक्षण देण्याचा जीआर काढू नका- नरहरी झिरवळ
Share on FacebookShare on Whatsapp

धनगर समाजाने आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण मागितलं आहे. त्याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी विरोध केला आहे. धनगर समाजाला आमच्यात आरक्षण देऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ने जो अहवाल तयार केला आहे तो सरकार का प्रसिद्ध करत नाहीत? आणि इतर कमिटी नेमून त्यात काय करणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला आदिवासी समाजातूनच आरक्षण द्या अशी मागणी धनगर समाजतर्फे केली जात आहे. धनगर आणि धनगड, असा शब्दांचा अपभ्रंश केला जातो. त्या माध्यमातून आम्हाला आदिवासीमध्ये घेतलं पाहिजे, अशी मागणी होती. पण ते आमच्यातले नाहीतच, असं आमचं मत अशी भूमिका झिरवळ यांनी मांडली. धनगर समाजाला एसटी प्रवगार्तून आरक्षण देण्याचा जीआर काढू नका असेही त्यांनी नमूद केले. झिरवळ यांच्या या विरोधामुळे आता मराठा-ओबीसी वादानंतर धनगर-आदिवासी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खूप दिवसांपासून आमची मागणी आहे की,सरकारला की पेसा भरती ही कायदा लागू झाला पाहिजे. पण या प्रकरणात आत्ता सरकार स्वतः कोर्टात गेलं आहे. त्यामुळे आमच्यामध्ये आणि आदिवासी मुलांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे . त्यामुळे या प्रकरणातील सुनावणीही होत नाही. पेसा कायदा हा लागू न करता या मुलांची भरती करा ना या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत, असे त्यांनी नमूद केलं.

धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मुंबईचं पाणी बंद करू, लहामटे यांनी दिला होता इशारा यापूर्वीही अजित पवार गटाचे नेते किरण लहामटे यांनी या मुद्यावरून आक्रमक भूमिका मांडली होती. जर धनगरांसाठीचा जीआर काढला, जर शासनाने धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भात पाऊल उचललं तर आम्ही सर्व आदिवासी समाजातील अमदार आणि खासदार आक्रमक पवित्रा घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली. आत्तापर्यंत आदिवासांनी एवढा त्याग केला आहे, जर तुम्ही आमच्या बोकांडी बसाल तर आम्ही मुंबईचं पाणी बंद करू, तिथे जोडणारे जे रस्ते आहेत ते थांबवू, रेल्वेचे रूळ उखडून टाकू असा थेट इशारा लहामटे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.

 

Previous Post

रणजी ट्रॉफीसाठी ‘महाराष्ट्र संघ’चा पुणेकर ऋतुराज गायकवाड असणार कॅप्टन

Next Post

आगीत जळून भस्मसात झालेल्या अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहाला नवी झळाळी प्राप्त होणार

Next Post
आगीत जळून भस्मसात झालेल्या अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहाला नवी झळाळी प्राप्त होणार

आगीत जळून भस्मसात झालेल्या अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहाला नवी झळाळी प्राप्त होणार

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.