वृत्तसंस्था : ‘बिग बॉस १९’मध्ये गौरव खन्ना हा एकटाच असा स्पर्धक आहे, जो प्रत्येक आठवड्यात नॉमिनेट होतो. त्याचबरोबर तो कॅप्टन्सीचा दावेदारदेखील बनत आहे. मात्र, त्याला अजून कॅप्टन बनता आलेले नाही. मागील टास्कमध्ये तो कॅप्टन बनला, पण काही तासांतच सत्ता पलटली आणि त्याची इम्युनिटी काढून घेतली गेली आणि दुसऱ्या कोणीतरी त्याची जागा घेतली. अशातच आता नव्या टास्कमध्ये तो कॅप्टन झाला आहे.
‘बिग बॉस’ने कॅप्टन्सी आणि राशन टास्कसाठी घरातल्या प्रत्येक सदस्याला दोन पर्याय दिले. यापैकी पहिला पर्याय असा आहे की, आपले सोशल मीडिया फॉलोवर्स जाणून घ्या आणि १०% राशनचा त्याग करा” आणि दुसरा पर्याय असा की, “फॉलोवर्स जाणून न घेता १०% राशन वाढवून घ्या. यात गौरव खन्नाने कॅप्टन्सीचा पर्याय निवडला, पण या निर्णयामुळे संपूर्ण घर नॉमिनेट झाले. अशनूर आणि प्रणित यांनी फॉलोवर्स जाणून घेतले नाहीत, त्याऐवजी त्यांनी राशनचा निर्णय घेतला. पण मालती, कुनिका, अमाल आणि तान्या यांनी सोशल मीडिया फॉलोअर्स जाणून घेण्याचा पर्याय निवडला, ज्यामुळे घरात ६०%च राशन उरलं. नंतर गौरवकडे दोन पर्याय होते. पहिला – तो कॅप्टन बनून संपूर्ण घराला नॉमिनेट करेल आणि ३०% राशन घेईल. दुसरा पर्याय असा की, तो शहबाजला कॅप्टन बनवून १००% राशन घेईल आणि कोणालाही नॉमिनेट केले जाणार नाही. गौरवने पहिला पर्याय निवडला, ज्यामुळे घरात मोठा वाद निर्माण झाला.

