Lokrakshanay
Wednesday, July 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

ठाण्यात FDA ची मोठी कारवाई; ११ लाखांचे आंबे जप्त, ३७ जणांना अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 3, 2026
in गुन्हेगारी, ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यात FDA ची मोठी कारवाई; ११ लाखांचे आंबे जप्त, ३७ जणांना अटक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : अन्न व औषध प्रशासन (FDA) राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली. ३० आणि ३१ मे २०२६ रोजी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह विविध भागांत टाकलेल्या धाडीत आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी इथिलिन सदृश्य स्प्रेचा गैरवापर करणाऱ्या तीन मोठ्या प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३,४५३ किलो आंब्यांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या नियमांनुसार फळांवर थेट इथिलिन स्प्रे मारण्यास मनाई असून सुरक्षित इथिलिन गॅस चेंबरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र तपासणीदरम्यान काही व्यापारी नियमांचे उल्लंघन करताना आढळले. जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या तपासणीत कॅल्शियम कार्बाइडचा वापर आढळला नसला तरी इथिलिन स्प्रेचा चुकीचा वापर स्पष्ट झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

याच कालावधीत जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त २९ ते ३१ मेदरम्यान गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ३६ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली असून ४ लाख ७४ हजार ४०७ रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून आतापर्यंत ३७ जणांना अटक करण्यात आली आहे, तर नियमांचे गंभीर उल्लंघन करणारी ३१ प्रतिष्ठाने सील करण्यात आली आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यापाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अशा गैरप्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून तक्रारींसाठी १८००२२२३६५ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोकण विभागाचे सहआयुक्त (अन्न) पराग नलावडे यांनी नागरिकांना अन्नभेसळ आणि प्रतिबंधित पदार्थांविरोधात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

गोव्यातील मंगेशीत उभारले जाणार लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचे भव्य स्मारक

Next Post

६२ लाख ‘लाडक्या बहिणींची’ ई-केवायसी बाकी; अर्जांची पुन्हा पडताळणी होणार – मंत्री अदिती तटकरांचे आश्वासन

Next Post
६२ लाख ‘लाडक्या बहिणींची’ ई-केवायसी बाकी; अर्जांची पुन्हा पडताळणी होणार – मंत्री अदिती तटकरांचे आश्वासन

६२ लाख 'लाडक्या बहिणींची' ई-केवायसी बाकी; अर्जांची पुन्हा पडताळणी होणार - मंत्री अदिती तटकरांचे आश्वासन

BreakingNews

मुंबईत २३ व २६ जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’

१५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा विलगीकरण सक्तीचे!

अमेरिकेत शिक्षणाचे स्वप्न कठीण; परदेशी विद्यार्थ्यांसाठी व्हिसाला ‘४ वर्षांची’ कमाल मर्यादा!

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुर्मिळ आठवणींना उजाळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन

ठाणे जिल्ह्यात १५२ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रांना’ हिरवा कंदील!

इराण-अमेरिका वादामुळे भारताची धाकधूक; कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर टांगती तलवार!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.