मुंबई : काही दिवसांपूर्वीच ३ आणि ४ डिसेंबर रोजी होणारी पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र तो आनंद फार काळ टिकला नाही. महापालिकेने पुन्हा एकदा शहरात पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला असून, ८ डिसेंबर सकाळी १० वाजल्यापासून ते ९ डिसेंबर सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईत तब्बल १५ टक्के पाणी कपात होणार आहे.
पाणी कपातीचे कारण म्हणजे तानसा धरणातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी २७५० मिमी व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम. हे दुरुस्तीचं काम अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे महापालिकेला पाणी कपात अपरिहार्य ठरली आहे. याच कारणासाठी ३-४ डिसेंबरदरम्यान पाणी कपात जाहीर केली होती; मात्र महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक येतात, होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून ती कपात रद्द करण्यात आली होती. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता परंतू आता परत त्यांना पाणी कपातीच्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

