Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 15, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालणाऱ्या आणि बहुजन व पीडित समाजासाठी झटणाऱ्या प्रविण गायकवाडांवर हल्ला झाला. हा हल्ला भाजपच्या गुंडांनी केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेधही करण्यात आला. अक्कलकोट घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या नावे प्रविण गायकवाड चालवत असलेली संघटना अनेक वर्षांपासून काम करत आहे. संस्थेच्या नावात श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे मागे छत्रपती लावण्यास प्रवीण गायकवाड यांना कोणतीच हरकत नव्हती. मात्र, धर्मादाय आयुक्त कार्यालयात तशा प्रकारच्या संस्थेची नोंदणी मुळात झाल्याने, या नावात बदल करू शकत नसल्याची तांत्रिक अडचण असल्याचे समोर आले होते. त्यामुळे केवळ निमित्त साधून, भाजप युवा मोर्च्याचा पदाधिकारी व सहकाऱ्यांनी केलेला भ्याड हल्ला निषेधार्ध असून, ‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था लयाला गेल्याचे’ स्पष्ट द्योतक आहे.

अहिल्यानगरचा छिंदम, कोरटकर, सोलापूरकर, माजी राज्यपाल कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी यांनी वेळोवेळी केलेला शिव छत्रपतींच्या अवमानावर व भाजप मातृ संस्थेच्या तत्कालीन नेत्यांनी श्री शंभूराजेंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. त्यावर भाजप युवा नेते गप्प का? असा संतप्त सवालही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी उपस्थित केला. संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी, बदलापूर चिमुरडीवरील अत्याचार, अक्षय शिंदे फेक एन्कांउटर यांसारखे विषय अद्याप कायदेशीर पूर्णत्वास येत नाही. राज्यात कोयता गँग, ठाणे पोलीस स्टेशनमधील गोळीबार, महिला अत्याचार व अक्कलकोटमधील आजच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून, मुख्यमंत्री फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा तातडीने राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली. या हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारावजा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातील बिघडत्या कायदा-सुव्यवस्थेविषयी व अस्मितेविषयी जराही चाड असेल तर ‘महायुतीच्या सत्तेतील’ दोन्ही पक्षांनी, फडणवीसांकडून गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, असे आवाहन गोपाळ तिवारी यांनी केले.

Previous Post

“३ वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होईल स्फोट”, पहाटे धमकीचा ईमेल

Next Post

NSE ला बॉम्बने उडवण्याचा ई-मेल, बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post
NSE ला बॉम्बने उडवण्याचा ई-मेल, बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

NSE ला बॉम्बने उडवण्याचा ई-मेल, बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

BreakingNews

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.