Lokrakshanay
Sunday, May 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘वक्फ’ची जमिनीवर दावांची शृंखला सुरूच, अजून एका गावातील २५ शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्या

वक्फ ट्रिब्यूनलने बुधोडा गावातील शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 13, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
‘वक्फ’ची जमिनीवर दावांची शृंखला सुरूच, अजून एका गावातील २५ शेतकऱ्यांना नोटीसा पाठवल्या
Share on FacebookShare on Whatsapp

लातूर – बुधोडा गाव – अलीकडेच अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाकडून नोटिसा प्राप्त झाल्याची घटना ताजे असतानाच आता आणखी एका गावातील शेतकऱ्यांना देखील अशीच नोटिसा मिळाल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावातील २५ शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्यूनलकडून नोटिसा आले आहेत. या नोटिसांमध्ये जवळपास १५० ते १७५ एकर जमिनीवर वक्फचा दावा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील समशाद अझगर हुसैन यांनी वक्फ न्यायाधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून वक्फ ट्रिब्यूनलने बुधोडा गावातील शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या. बुधोडा गावातील शेतकरी राजेश बुधोडकर यांनी सांगितले की, आमच्याकडे आलेली नोटीस तारीख संपल्यानंतर आली होती. त्यामुळे आम्ही ४ डिसेंबरला उपस्थित होऊन प्रकरण समजून घेण्यासाठी वकील नेमला आहे. पुढील सुनावणीची तारीख २८ डिसेंबर दिली आहे, असं ते म्हणाले.

राजेश बुधोडकर यांनी हेही सांगितले की, आम्ही २५ शेतकऱ्यांनी एक वकील नेमला आहे. १९५५ मध्ये माझ्या आजोबाच्या नावावर ही जमीन आली होती आणि आज चौथ्या पिढीपर्यंत आम्ही या जमिनीवर काम करत आहोत. मात्र आता अचानक हा दावा केला जात आहे. अशा प्रकारे आम्हाला वक्फ ट्रिब्यूनलकडून विनाकारण त्रास दिला जात आहे.

अलीकडे राज्यभर वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा ठोकले आहेत. लातूर जिल्ह्यातील तळेगाव गावातील ३०० एकर जमिनीवर वक्फने दावा केला होता. त्या संदर्भात वक्फ ट्रिब्यूनलने १०३ शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या होत्या. यावर शेतकऱ्यांनी सरकारकडून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. आणि आता बुधोडा गावात देखील हेच प्रकार घडले आहेत. यावर भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की, “कोणीही शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करु शकत नाही, आणि शेतकऱ्यांच्या मालकीची एक इंच जमीन देखील कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”

Previous Post

महिला सरपंचावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

ठाण्यातील पाणीकपात: १४-१५ डिसेंबर रोजी १५ टक्के पुरवठ्यात कपात

Next Post
ठाण्यातील पाणीकपात: १४-१५ डिसेंबर रोजी १५ टक्के पुरवठ्यात कपात

ठाण्यातील पाणीकपात: १४-१५ डिसेंबर रोजी १५ टक्के पुरवठ्यात कपात

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.