Lokrakshanay
Friday, April 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात स्वामी मठावर महापालिकेची कारवाई; स्वामी भक्तांचा संताप, मोर्चा काढण्याचा निर्णय!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 8, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यात स्वामी मठावर महापालिकेची कारवाई; स्वामी भक्तांचा संताप, मोर्चा काढण्याचा निर्णय!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : ठाण्यातील २० वर्ष जुन्या स्वामी समर्थांच्या मठावर ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी देखील एकत्र येत महापालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला. येत्या सोमवारी कॅडबरी नाका ते ठाणे महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नसून स्वामी भक्तांचा असेल असेही स्पष्ट करण्यात आले. कारवाईपूर्वी याठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात झाला होता.

घोडबंदर येथील आनंदनगर भागात स्वामी समर्थांचे २० वर्ष जुने मठ आहे. हे मठ म्हाडाच्या जागेत असून अनेक वर्षांपासून या जागेवरून वाद सुरु आहे. हजारो नागरिक येथे दर्शानासाठी येत असतात. येथे बालसंस्कार तसेच इतर उत्सव देखील मोठ्याप्रमाणात साजरे होतात. येथे उद्यान उभारले जाणार असल्याने येथील मठावर कारवाई करण्यास ठाणे महापालिकेने सुरुवात केली आहे. कारवाईची माहिती मिळताच स्वामी समर्थ भक्तांकडून तीव्र संताप व्यक्त केला. हे खूप जुने मठ आहे. हे मठ हलविल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील असे एका भाविकाने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) मनोज प्रधान यांनी सांगितले की, मी स्वामींचा भक्त म्हणून येथे आलो होतो. आम्ही महापालिकेवर धडक मोर्चा काढणार असून सर्व पक्षीय स्वामी भक्त यामध्ये सहभागी होणार आहे. हे कोणाच्या सांगण्यावरून सुरु आहे आम्हाला माहीत आहे. शहरातील उद्याने आधी सुधारा आणि मग येथे या असे प्रधान यांनी सांगितले. आम्ही सोमवारी कॅडबरी जंक्शन येथे जमणार असून कॅडबरी ते ठाणे महापालिका असा मोर्चा निघेल असा इशारा त्यांनी दिला. या मोर्चानंतर आयुक्तांसोबत चांगली चर्चा घडेल असा विश्वास आहे असेही त्यांनी सांगितले. ठाकरे गटाचे प्रदीप पुर्णेकर यांनी सांगितले की, ठाण्यातील उद्यानात गर्दुल्ले फिरतात. उद्यान बनले आहेत तिथे लक्ष दिले जात नाही. ठाण्यात अमली पदार्थ सर्रास मिळतात. या मठात चांगले उपदेश मिळत असताना येथे कारवाई केली जात आहे. येथे मुस्लिम समाजाचे लोक देखील येतात. येथे कोणतीही जात धर्म पाहिले जात नाही असे त्यांनी सांगितले.

Previous Post

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटींची फसवणूक केल्याचा संशय

Next Post

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी -२० सामना रद्द?

Next Post
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी -२० सामना रद्द?

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी -२० सामना रद्द?

BreakingNews

चेन्नईचा मुंबईवर १०३ धावांनी दणदणीत विजय

आता WhatsApp वरूनच करता येणार मोबाईल रिचार्ज; भारतात नवीन फीचरची सुरुवात

ठाणे सॅटीस पुलावर शिवशाही बसला आग; २० प्रवाशांचे थरारक बचाव!

गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.