Lokrakshanay
Tuesday, February 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

६ वर्षे एकाच जागी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 13, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
६ वर्षे एकाच जागी असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : वर्षानुवर्षे एकाच जागी असलेल्या सरकारी खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या याच वर्षी एप्रिलमध्ये बदल्या करण्यात येणार आहेत. या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही किंवा त्यांची बदली रद्दही केली जाणार नाही. बदली झाल्यानंतरही अधिकारी-कर्मचारी त्या जागी रुजू होत नसल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण होतात. त्यामुळे बदली अधिनियमानुसार बदल्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे स्पष्ट निर्देश सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना दिले आहेत.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ अधिसूचित करण्यात आलेला आहे. या नियमातील नियम ३ व ४ नुसार, सर्व विभागातील ६ वर्षे पूर्ण झालेल्या सह सचिव, उप सचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहायक कक्ष अधिकारी, लिपिक-टंकलेखक व लघुलेखक संवर्गातील अधिकारी-कर्मचारी यांच्या बदल्या करण्याबाबतची कार्यवाही एप्रिल-मे २०२६ मध्ये करण्यात येणार आहे. मात्र, मागील काही वर्षापासून मंत्रालयातील विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर त्यांच्या बदलीस मुदतवाढ देण्याची मागणी तसेच बदली रद्द करण्याची मागणी संबंधित प्रशासकीय विभागाकडून केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त न केल्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याचे या परिपत्रकात नमूद केले आहे.

Previous Post

आदिवासी विकास विभाग व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करार

Next Post

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी ४१ तास खुलं!

Next Post
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी ४१ तास खुलं!

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी ४१ तास खुलं!

BreakingNews

मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई! एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निलंबित

राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

हॅकरचा थेट पोलिसावरच डल्ला; विना ओटीपी व्यवहार झाल्याने बँक रडारवर!

बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर

१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे

राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.