मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या लोकांना वन विभागाकडून नोटीस मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात राहणाऱ्या आदिवासींनी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. घरं रिकामी करण्यास सांगण्यात आल्याचा आणि बस सेवा बंद केल्याचा आरोप आदिवासींनी केला. मात्र, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने कोणालाही थेट नोटीस दिली नसल्याचे म्हटलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सूचना लावण्यात आल्याचे सांगितले आहे.

