Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

दिवा-भंडार्ली क्लीन-अप: कचऱ्याच्या समस्या वैज्ञानिक उपायांनी हाताळणार!

पहिल्या टप्प्यात २२ लाख मेट्रीक टनपैकी साडे आठ लाख मेट्रीक टन इतक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून ही जमीन कचरामुक्त करून पुर्वीप्रमाणे केली जाणार आहे. राज्य शासनाने ठाणे महापालिकेला कचरा भुमीसाठी भिवंडी येथील आतकोली भागात जागा देऊ केली असून येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीसाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 14, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाणे महापालिकाने सुरु केली ”एक खिडकी” योजना – गणेशोत्सव मंडपांच्या परवानगीसाठी
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : दिवा आणि भांडर्ली परिसरातील कचराभुमी ठाणे महापालिकेने बंद केली असली तरी त्याठिकाणी कचऱ्याचे ढिग कायम असून या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून तेथील जमीन पुर्वरत करण्यासाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात २२ लाख मेट्रीक टनपैकी साडे आठ लाख मेट्रीक टन इतक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून ही जमीन कचरामुक्त करून पुर्वीप्रमाणे केली जाणार आहे. राज्य शासनाने ठाणे महापालिकेला कचरा भुमीसाठी भिवंडी येथील आतकोली भागात जागा देऊ केली असून येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणीसाठी पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर डायघर येथेही कचऱ्यापासून वीज निर्मीती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पुर्णपणे कार्यान्वित झालेला नसला तरी याठिकाणी कचरा वर्गीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. या दोन्ही ठिकाणी कचराभुमी होण्यापुर्वी पालिका प्रशासनाकडे हक्काची कचराभुमी नव्हती. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणारा ९५० मेट्रिक टन कचरा दिवा भागात टाकला जात होता. येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक क्षमतेचे प्रकल्प उभारले नाहीत म्हणून हरीत लवाद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पालिकेला वांरवार नोटीसा येत होत्या.

या कचराभूमीमुळे परिसरात दुर्गंधी पसरण्याबरोबरच सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे ही कचराभूमी बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून आंदोलने केली होती. परंतु डायघर प्रकल्प कार्यान्वित होण्यास उशीर होत होता. त्यामुळे डायघर प्रकल्प सुरू होईपर्यंत शहराबाहेर म्हणजेच भांडर्ली भागात पालिकेने जागा भाड्याने घेऊन तिथे कचरा टाकण्यास सुरू केले होते. या कचराभुमीमुळे शेतीचे नुकसान होऊ लागले. यामुळे स्थानिकांनी कचराभुमीस विरोध सुरू केला. अखेर पालिकेने डायघर प्रकल्पाचे काम पहिल्यात सुरू करत भांडर्ली कचराभुमी बंद केली. असे असले तरी दिवा आणि भांडर्ली कचराभुमीवर कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत. हे ढिग हटवून तेथील जमीन पुर्वरत करण्यासाठी पालिका प्रशासनाने आता पाऊले उचलली आहेत. यासाठी पालिकेने निविदा काढल्या आहेत. या संदर्भात घनकचरा विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. ठाणे महापालिका क्षेत्रातील जुन्या कचराभुमी व्यवस्थापनासाठी (लेगसी वेस्ट) मान्यता प्राप्त आणि अनुभवी निविदाकारांकडून पालिका करून घेणार असून त्यानुसार पालिकेने ही निविदा काढली आहे. दिवा आणि भांडर्ली कचराभुमीवर अंदाजे २२ लाख मेट्रीक टन कचरा आहे. पहील्या टप्प्यात त्यापैकी साडे आठ लाख मेट्रीक टन इतक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून ही जमीन कचरामुक्त करण्यात येणार आहे. तर, उर्वरित कचऱ्याचीही अशीच विल्हेवाट लावली जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Previous Post

लालबागमध्ये गोंधळ: पोलिसांच्या मारहाणीत जनक्षोभ निर्माण झाला

Next Post

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेला कांद्याच्या मुद्द्यावरून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Next Post
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेला कांद्याच्या मुद्द्यावरून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेला कांद्याच्या मुद्द्यावरून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.