मुंबई : दहावी आणि बारावीची वार्षिक परीक्षा कार्यक्रम जाहीर झाला असून कॉपी मुक्त परीक्षा अभियान अधिक जोरकस पणे राबवण्यात येणार आहे. यासाठी विविध उपायोजना करण्यात आल्या असून सर्व परीक्षा वर्गात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांनाही कॉपी पासून परावृत्त करण्याबाबत समुपदेशन केले गेले आहे. फेब्रुवारी/मार्च २०२६ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १० फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान या परीक्षा घेण्यात येणार आहेत. तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( १० वी) परीक्षा दिनांक २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.परीक्षाकाळात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. या परीक्षा सीसीटीव्ही निगराणीखाली घेण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या जिल्हानिहाय सह विचार सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक यांच्या वेळोवेळी अऑफलाइन व ऑनलाइन मीटिंग घेऊन कॉपीमुक्त परीक्षा उपक्रम राबविण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने केल्या आहेत. ७ व ८ जानेवारीला कॉपीमुक्त परीक्षा अभियान या उपक्रमांतर्गत मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यकाकक्षेतील सहा जिल्ह्यांची मुख्याध्यापक / प्राचार्य यांची ऑनलाइन सभा घेऊन विभागीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सचिव व विभागीय सहाय्यक सचिव यांनी मार्गदर्शन केले.त्यामध्ये विद्यार्थ्यांने भयमुक्त वातावरणात परीक्षा कशी द्यावी व परीक्षा देताना काय करावे व काय करू नये याबाबत सूचना देण्यात आल्या.विभागीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्या ऑनलाइन सभा घेऊन विभागीय सचिव व विभागीय सहा, सचिव यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांकरिता गैरमार्ग शिक्षा सूची मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या निदर्शनास आणून दिली व सदर शिक्षा सूची विद्यार्थी व पालक यांच्या देखील निदर्शनास आणण्यात यावी असे निर्देश देण्यात आले.उदाहरणार्थ विद्यार्थ्यांनी अधिकृत प्रवेश पत्र स्वतः जवळ बाळगावे व गैरमार्ग होईल असे कोणतेही साहित्य स्वतः जवळ बाळगू नये., लिहिलेले नोट्स, गाईड्स, हस्तलिखित उत्तरे, कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने वापरू नयेत, विद्यार्थ्यांनी स्वतः कॉपी करू नये व इतरांना प्रवृत्त करू नये, तसेच विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेवर आपला बैठक क्रमांक अंकात किंवा अक्षरी बरोबर लिहावा. फॉर्म नंबर एक वर स्वतःचा बैठक क्रमांकाची खात्री करून त्यासमोर उपस्थिती बाबत स्वाक्षरी करावी. कॉपी मुक्त अभियान म्हणजे विद्यार्थाना वेठीस धरणे नाही तर केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय, पुरेशे स्वच्छतागृहे, वीज पुरवठ्यासाठी इन्वर्टर किवा जनरेटरची सुविधा, परीक्षा साहित्य ठेवण्यासाठी कडेकोट सुरक्षा असलेली स्ट्रॉग रूम अनिवार्य आहे. ताण तणाव व आहार याबाबत घ्यावयाची काळजी.

