Lokrakshanay
Wednesday, July 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“आई, दुपारी फोन करतो…” म्हणत घराबाहेर पडलेला विश्वास कायमचाच निघून गेला; पाबे घाटातील अपघाताने हळहळ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 30, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
“आई, दुपारी फोन करतो…” म्हणत घराबाहेर पडलेला विश्वास कायमचाच निघून गेला; पाबे घाटातील अपघाताने हळहळ
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : “आई, मी रविवारी दुपारी फोन करतो. घरी जेवायला येणार की नाही ते सांगतो,” असे सांगून घराबाहेर पडलेल्या २५ वर्षीय विश्वास सातिम याचा तो आपल्या आईशी झालेला शेवटचा संवाद ठरला. मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी राजगड किल्ल्यावर पदभ्रमणासाठी निघालेल्या विश्वासचा पाबे घाटातील भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. मुंबईतील विलेपार्ले येथील नेहरूनगर परिसरात राहणारा विश्वास सातिम हा रविवारी पहाटे घडलेल्या या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला. मिळालेल्या माहितीनुसार, राजगडकडे जाणारी खासगी लहान बस पाबे घाटातील एका तीव्र वळणावर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने संरक्षक कठडा तोडत सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात विश्वास सातिमसह आणखी दोघांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मूळचा रायगड जिल्ह्यातील संदेरी गावचा असलेला विश्वास सातिम हा मनमिळाऊ आणि हसमुख स्वभावामुळे मित्रपरिवारात लोकप्रिय होता. त्याला लहानपणापासून क्रिकेटची विशेष आवड होती. नोकरी सांभाळत तो विविध क्रिकेट स्पर्धांमध्येही सहभागी होत असे. शनिवार-रविवारच्या सुट्टीत मित्रांसोबत राजगडावर जाण्याचा बेत आखून तो घरातून बाहेर पडला होता. घरातून निघताना त्याने आईला दुपारी फोन करून घरी जेवायला येणार की नाही हे सांगण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अपेक्षित फोन येण्याऐवजी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला आणि विश्वास अपघातात जखमी झाल्याची माहिती कुटुंबाला मिळाली. त्यानंतर सकाळी सुमारे आठ वाजता त्याच्या निधनाची दुर्दैवी बातमी घरच्यांना कळविण्यात आली. ही बातमी समजताच सातिम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात आणि मित्रपरिवारातही शोककळा पसरली आहे.

 

Previous Post

ठाणे ग्रामीणमध्ये पोलिओ मोहिमेला उदंड प्रतिसाद; १.१७ लाखांहून अधिक चिमुरड्यांना डोस!

Next Post

बदलापुरात गढूळ पाण्याचा पुरवठा; नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळूनच पिण्याचे आवाहन

Next Post
बदलापुरात गढूळ पाण्याचा पुरवठा; नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळूनच पिण्याचे आवाहन

बदलापुरात गढूळ पाण्याचा पुरवठा; नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळूनच पिण्याचे आवाहन

BreakingNews

बदलापुरात गढूळ पाण्याचा पुरवठा; नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळूनच पिण्याचे आवाहन

“आई, दुपारी फोन करतो…” म्हणत घराबाहेर पडलेला विश्वास कायमचाच निघून गेला; पाबे घाटातील अपघाताने हळहळ

ठाणे ग्रामीणमध्ये पोलिओ मोहिमेला उदंड प्रतिसाद; १.१७ लाखांहून अधिक चिमुरड्यांना डोस!

पावसाळ्यात कोणते ५ पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडते?

TET प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी!

CID मध्ये मृतदेहाची भूमिका, दिवसाला मिळायचे एवढे रुपये; अर्चना गौतमने सांगितला संघर्षाचा प्रवास!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.