मुंबई : मराठा आरक्षणाच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं असून आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर आणि मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी समाजासाठी कालही काम करत होतो आणि उद्याही करत राहीन. मराठा, ओबीसी किंवा महाराष्ट्रातील कोणताही समाज असो, प्रत्येकासाठी काम करणं माझं कर्तव्य मानतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या, तर कधी फुलांचे हार मिळतात असं ते म्हणाले आहेत.

