Lokrakshanay
Wednesday, June 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महाराष्ट्र सरकार विधानसभेत करणार टी २० विश्वविजेत्या खेळाडूंचा जंगी सत्कार

टीम इंडिया आज भारतात परतली आहे. दिल्ली ते मुंबई टीम इंडियाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. टीम इंडिया मायदेशी टी २० चा वर्ल्डकप घेवून आल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये एक उत्साहाची लाट आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 4, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
महाराष्ट्र सरकार विधानसभेत करणार टी २० विश्वविजेत्या खेळाडूंचा जंगी सत्कार
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : तब्बल १७ वर्षांनी टी २० विश्वचषक जिंकलेली इंडिया टीम आज मुंबईत येणार आहे. मरीन लाइन्स ते वानखेडे स्टेडिएम या मार्गावर टीम इंडियाची मिरवणुक जल्लोषात निघणार आहे. वानखेडे स्टेडिएममध्ये क्रिकेट चाहत्यांना एंट्री सुद्धा फ्री असेल. टीम इंडियाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी खुद्द पीएम मोदींनी खेळाडूंसोबत दिल्लीत स्नेहभोजन समारंभ आयोजित केला. याच पार्श्वभूमीवर राज्यात सुद्धा टीम इंडियाच्या खेळाडूंच्या स्वागतासाठी एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तब्बल १७ वर्षांनी भारताने टी २० वर्ल्डकप जिंकला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्यावतीने सुद्धा खेळाडूंचे स्वागत करण्यात येणार आहे. विधानसभेत आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबईकर खेळाडूंच्या स्वागताचा प्रस्ताव मांडला. या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या चौघांचा समावेश आहे. हे चारही खेळाडू मुंबईकर असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सभागृहात सांगितले त्यामुळे पहिल्यादांचा थेट विधानभवनात सीएम शिंदेंच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार होणार आहे, असा प्रस्ताव प्रताप सरनाईक यांनी मांडला.

विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने सर्वपक्षाचे आमदार मुंबईत आहेत अश्यावेळी देशाची मान उंचावली अश्या खेळाडूंचे आपण मनोबल वाढवले पाहिजे यासाठी विधीमंडळाकडून खेळाडूंचा सत्कार व्हावा आणि टीम इंडियाचे प्रमुख रोहित शर्मा खुद्द मुंबईकर असल्याने महाराष्ट्रासाठी सुद्धा गर्वाची गोष्ट आहे असे म्हणत सीएम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सत्कार प्रस्तावाचा निवेदन प्रताप सरनाईक यांनी सादर केले आहे. उद्या ५ जुलैला विधीमंडळाच्या परिसरात टीम इंडियाचे कॅप्टन रोहित शर्मा यासह इतर खेळाडूंचा सीएम शिंदे महाराष्ट्र सरकारच्यावतीने स्वागत करतील. भविष्यात आणखी देशाचे नाव उंच करण्याची प्रेरणा खेळाडूंना मिळेल यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. इतकेच नव्हे तर विधीमंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीएम शिंदे, विरोधीपक्षनेते आणि सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत हा भव्य सत्कार सोहळा उद्या पार पडणार आहे.

Previous Post

मध्य रेल्वेने रेल्वेच्या अलार्म चेनचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर केली कारवाई; प्रवाशांकडून ६३.२१ लाखांची दंडवसुली

Next Post

विधानसभा अध्यक्षांनी दिले आदेश; मुंबईत अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या

Next Post
विधानसभा अध्यक्षांनी दिले आदेश; मुंबईत अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या

विधानसभा अध्यक्षांनी दिले आदेश; मुंबईत अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या

BreakingNews

राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा हिमांशू रॉय लिगसी पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी उठली!

माहितीचा अधिकार नियम २०२६ विरोधात अण्णा हजारे मैदानात!

बेस्टचा संप मिटला, मुंबईत बस सेवा पुन्हा सुरू!

चहाविक्रेत्याच्या सतर्कतेमुळे बनावट नोटांचा भांडाफोड; पुण्यात दोघांना अटक!

७०० रुपयांच्या पगारापासून लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत; ‘बाघा’चा प्रेरणादायी प्रवास!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.