Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

२१ किमी मार्ग मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी २१ किमी मार्ग ; मुंबई महापालिकेचा ४ हजार ५०० कोटी रुपयांचा प्रकल्प

मुंबईतील विविध विकासकामांमुळे सतत पाण्याची पाइपलाइन फुटण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडचणी येतात. यावर उपाय म्हणून महापालिकेने जलबोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 26, 2023
in ताज्या बातम्या, मुंबई
बांधकामे रोखण्याचा आयुक्तांचा इशारा, उद्योग व व्यवसायांसाठी सूचना; बांधकामांबाबत पालिकेच्या सूचना
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न, विविध विकासकामांमुळे पाइपलाइन फुटण्याच्या घडलेल्या घटनांमुळे मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा होण्यास अडचणी येतात. त्यामुळे मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पिसे-पांजरापोळ जलशुद्धीकरण केंद्र ते मुलुंडपर्यंत २१ किमीचा जलबोगदा तयार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सध्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असून या कामासाठी तब्बल ४ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुंबईला पाणीपुरवठा हा अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांतून होतो. सातही तलावांची पाणीसाठवण क्षमता ही १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या सातही तलावातून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या जलवाहिन्यांचे बाह्य विभागामध्ये सुमारे ३८० किलोमीटर अंतराचे अतिशय मोठे असे जाळे आहे. तर ९० किलीटरचे भूमिगत जलवाहिन्यांचेही जाळे आहे. मात्र या जलवाहिन्यांना कुठेना कुठे, वेगवेगळ्या कारणांमुळे गळती लागते. काहीवेळा पाणी चोरीचाही प्रयत्न होतो आणि जलाशयातून गळती सुरू होते. विविध विकासकामांचाही जलवाहिन्यांना फटका बसतो. जलवाहिन्यांची सुरक्षा पाहता मुंबई महापालिकेने मुंबई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे-पांजरापोळ जलशुध्दीकरण केंद्र ते मुलुंडपर्यंत २१ किलोमीटरचा जलबोगदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या याचे सर्वेक्षण सुरू आहे. लवकरच अहवाल तयार करून तो पालिकेला सादर होईल. जलबोगदा तयार होताच यामधूनच मुंबई शहर व पूर्व उपनगराला सुरळीतपणे पाणीपुरवठा केला जाणार आहे. ही जलवाहिनी जमिनीपासून १०० मीटर खोलवर असेल. सध्या या पिसे-पांजरापोळ ते मुलुंडरपर्यंत रस्त्यावरून जाणारी समांतर अशी जलवाहिनी आहे. या जलवाहिनीतून पाणी अन्य लहान जलवाहिनीमार्फत मुंबई शहर व पूर्व उपनगराला पाणीपुरवठा केला जातो. बोगदा तयार होताच यातून पाणीपुरवठा सुरू केला जाईल. त्यानंतर समांतर जाणाऱ्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. जलबोगद्याला कोणताही धोका पोहोचल्यास समांतर अशा जलवाहिनीतूनही पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन असणार आहे. पिसे पांजरापोळ ते मुलुंड असा २१ किमीचा जलबोगदा तयार केला जाणार असून त्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या समांतर अशी जलवाहिनी असली तरीही सुरक्षेचा प्रश्न आणि विविध कामे पाहता नवीन जलबोगदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुंदवली ते भांडुप संकुलादरम्यानच्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राला ७५ टक्के पाणीपुरवठा होतो. जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे (बोअरवेल) खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. दुरुस्तीसाठी जलबोगदा ३१ मार्च २०२३ पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे पालिकेला एक महिन्यासाठी १५ टक्‍के कपात जाहीर करावी लागली होती. यामध्ये कूपनलिकेचे काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला ७५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. हा दंड अद्यापही वसूल झालेला नाही. सध्या घाटकोपर ते परळ अशा आणखी एक जलबोगद्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. हा जलबोगदा ११० किमी खोलवर आहे. याचेही काम पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल. मुंबईत काही भागातून जाणाऱ्या जलवाहिन्या या उघड्यावर आहेत, तर काही भूमिगत आहेत. मात्र उघड्यावरील जलवाहिन्यांचा धोका पाहता जलबोगदे तयार केले जात आहेत.

Previous Post

महाराष्ट्रात दीड वर्षात विकासाचा कायापालट – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

Next Post

जे. जे. रुग्णालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम तातडीने पूर्ण करावे – मंत्री हसन मुश्रीफ

Next Post
जे. जे. रुग्णालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम तातडीने पूर्ण करावे – मंत्री हसन मुश्रीफ

जे. जे. रुग्णालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम तातडीने पूर्ण करावे – मंत्री हसन मुश्रीफ

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.