Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील ह्यांचे नाव देण्यासाठी मोर्चा, केंद्र सरकारला खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 3, 2025
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील ह्यांचे नाव देण्यासाठी मोर्चा, केंद्र सरकारला खासदार सुरेश म्हात्रे यांचा इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : लोकनेते दि. बा. पाटील ह्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी भूमिपुत्रांचा आणि दि. बा समर्थकांचा नवी मुंबई विमानतळावर ६ ऑक्टोबर रोजी विराट धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. बुधवार दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी भिवंडी लोकसभेचे आणि भूमिपुत्रांचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे ह्यांनी पत्रकार परिषद घेत नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यापूर्वी विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दि.बा. पाटील साहेबांचे नाव द्यावे आणि तसे अधिकृत नोटिफिकेशन काढून घोषित करावे, अन्यथा सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांचा आणि दि.बा समर्थकांचा विराट असा मोर्चा निघणार, असा इशारा केंद्र सरकारला देण्यात आला आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पहिल्या फळीचे नेते, कुळ कायद्याची अंमलबजावणी करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कसणार्‍या शेतकर्‍यांना जमिनीचे मालक बनवणारे नेते, जमिनीच्या बदल्यात जमीन हा कायदा प्रस्थापित करणारे, नवीन भूसंपादन पुनर्वसन आणि पुनरस्थापना कायद्याची पायाभरणी करणारे नेते, स्त्रिभृण हत्या विरोधी कायदा देशाला देणारे, ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात महाराष्ट्र आणि देशाचे नेतृत्व करणारे नेते, पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार तरी ही स्वतःचे घर न बांधू शकणारी निस्वार्थ व्यक्ती आणि त्यांच्या भूमीत होणार्‍या विमानतळाला त्यांचे नाव देण्यात दिरंगाई होत असेल तर ते कदापी खपून घेतले जाणार नाही असा इशारा खासदार सुरेश म्हात्रे ह्यांनी दिला आहे.

Previous Post

उत्सवाच्या काळात बनावट चलन बदली करणारी टोळी गजाआड

Next Post

फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; तब्बल १४ वर्षांनंतर ‘लिओनेल मेस्सी’ पुन्हा भारतात येणार

Next Post
फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; तब्बल १४ वर्षांनंतर ‘लिओनेल मेस्सी’ पुन्हा भारतात येणार

फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; तब्बल १४ वर्षांनंतर ‘लिओनेल मेस्सी’ पुन्हा भारतात येणार

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.