Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सायबर जनजागृती माह ऑक्टोबर २०२५’ चे उदघाटन संपन्न

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 6, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सायबर जनजागृती माह ऑक्टोबर २०२५’ चे उदघाटन संपन्न
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या आव्हानांवर भाष्य करताना सांगितले की, आपण डिजिटल युगात प्रवेश केला आहे आणि त्यामुळे या युगाला साजेशी मूल्ये निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आजच्या काळात सायबर गुन्हे रोखणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे. गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला शोधून त्याला शिक्षा करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच असे गुन्हे होऊ नयेत यासाठी व्यापक जनजागृती करणे देखील आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुर्दैवाने सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले अनेक नागरिक बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल करत नाहीत.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) गैरवापरामुळे फिशिंग, ओटीपी फसवणूक, डीपफेक, आवाज व चेहरा क्लोनिंग यांसारख्या पद्धतींचा वापर वाढला आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन व्यवहार आणि पेमेंट्समधील माहितीचा गैरवापर होऊन स्कॅम, एक्स्टॉर्शन आणि सायबर बुलिंगसारखे प्रकार घडतात. कुकीज स्वीकारल्यानंतर वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून वेळेवर तक्रार करणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात जागतिक दर्जाची सायबर सिक्युरिटी लॅब, प्रतिसाद केंद्रे आणि रेग्युलेटरी यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे गुन्हा घडल्यानंतर तात्काळ कारवाई करून नुकसान मर्यादित करता येते. मात्र त्यासाठी तक्रार वेळेवर होणे आवश्यक आहे. कोणताही डिजिटल गुन्हा हा त्याचा ‘डिजिटल फिंगरप्रिंट’ मागे ठेवतो, आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी राज्याची क्षमता सतत वाढवली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, युवकांपर्यंत सायबर सुरक्षिततेबाबत माहिती पोहोचवणे ही आजची गरज आहे. ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या फसवणुकींबाबत नागरिकांना जागरूक करणे आवश्यक आहे. अशा घटनांमध्ये १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यास मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचता येते. या कार्यक्रमात अभिनेते अक्षय कुमार आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे सायबर जनजागृतीचा संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत, विशेषतः तरुणाईपर्यंत पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ड्रोन व फ्लाइंग कंदील उडविण्यास बंदी

Next Post

ठाणे, कोपर रेल्वे स्थानक बुलेट ट्रेन स्थानकला जोडणार

Next Post
ठाणे, कोपर रेल्वे स्थानक बुलेट ट्रेन स्थानकला जोडणार

ठाणे, कोपर रेल्वे स्थानक बुलेट ट्रेन स्थानकला जोडणार

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.