Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

कार्यशाळेआधी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला

admin by admin
July 16, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
कार्यशाळेआधी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला
Share on FacebookShare on Whatsapp

 

ठाणे : कुठलेही पक्ष सत्तेत एकत्र येतात, तेव्हा त्यांचा फायदा होतो. अशाचप्रकारे हे तिन्ही पक्ष फायद्यासाठी एकत्र आले आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गुरुवारी भिवंडी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य मंत्रिमंडळ जागा वाटपातील तिढा लवकरच सुटेल, असे सूतोवाच करत त्यांनी महाविकास आघाडीवर यावेळी टीका केली. भिवंडी येथील अंजुर परिसरात गुरुवारी भाजपाच्यावतीने आमदार, खासदार आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती.

या कार्यशाळेआधी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विकासाच्या मुद्द्यावर तीन पक्ष एकत्र आले असून तिन्ही पक्षाचे नेते सक्षम आहेत. महायुतीचा फायदा तिन्ही पक्षांना होईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक माणसाला वेगळी भूमिका घेण्याचा अधिकार आहे. पण, वेगळ्या भूमिकेमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसू नये, असे कुणीही काही करणार नाही. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांची समजूत काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पक्षात वर्चस्व असून त्यांनी अनेक माणसे जोडली आहेत. ते सरकारमध्ये सामील झाल्याने आमची महायुती झाली आहे, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या वेळेसही जागा वाटपाचा तिढा लगेच सुटला नव्हता आणि ते आता आमच्यावर आरोप करीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्य मंत्रिमंडळ जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल, परंतु मला हा तिढा वाटत नाही. तीन पक्ष एकत्र आल्याने जागा वाटपाबाबत चर्चा होऊनच निर्णय होईल. महाविकास आघाडीचे लोक आमच्यावर आरोप करत आहेत. पण, त्यांच्या सरकारच्या काळात कुठे एका दिवसात जागा वाटप झाली होती, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जागा वाटपाचा तिढा राज्यात सुटला नाहीतर, हा तिढा राष्ट्रीय पातळीवर सुटेल. तसेच सर्वजण सरकारमध्ये असल्यामुळे कोणते खाते कुणाकडे असले तरी सर्वांना राज्याचा विकास करायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Next Post

रेल्वेरुळ ओलांडणं नर्सला जीवावर बेतलं

Next Post
रेल्वेरुळ ओलांडणं नर्सला जीवावर बेतलं

रेल्वेरुळ ओलांडणं नर्सला जीवावर बेतलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BreakingNews

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.